UPSC परीक्षा पास होणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी मेहनत तर हवीच पण सतर्क, हजरजबाबी वृत्ती आणि सद्सद् विवेकबुद्धी आणि आपल्या क्षमतांचा पुरेपुर वापर करून यश मिळवता यायला हवं. प्रत्येकजण ही परीक्षा देत असताना अगदी छोट्या चुकांमुळे मार्क घालवतो आणि यश निसटतं. IPS अक्षत कौशल यांनी तर तब्बल 4 वेळा अपयश पचवलं
त्यांना हे 4 वेळा अपयश कसं आलं आणि त्यांना 5 व्या टप्प्यात कसं यश मिळवलं हे जाणून घेणार आहोत. अक्षत कौशल हे IPS अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
मी अनेक तास न खाता-पिता ग्रंथालयात बसून अभ्यास केला पण पहिल्या प्रयत्नात केवळ अपयश मिळालं. 'आपली क्षमता ओळखा आणि त्यानुसार तयारीला लागा. त्यासोबत नीट आरोग्याची काळजी घ्या. खाणं झोपणं आणि आरोग्य सांभाळलं तर मेंदू ताजातवाना राहातो आणि अधिक ऊर्जेनं अभ्यास होतो.' असा सल्ला IPS अक्षत यांनी दिला आहे.
पाचव्या प्रयत्नात काय घडले याचा अंदाजदेखील त्यांना नव्हता. 17 दिवस तयारी करून त्यांना पाचव्यांदा परीक्षेत यश मिळालं आहे. 'या परीक्षेसाठी सर्वप्रथम संयम आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीत ओव्हर कॉन्फिडन्ट राहू नका. हा अॅटिट्यूट काही ठिकाणी आपल्यासाठी घातक ठरू शकतो' असं अक्षत यांचं म्हणणं आहे.
'अनेकदा आपण आपल्यातल्या क्षमता ओळखण्यात किंवा आपल्याला जे जमू शकतं ते करण्यात कमी पडतो. अशावेळी मित्रांचा सल्ला ऐका. संगत चांगली असेल तर आयुष्यात आपल्याला योग्य सल्ला मिळतो आणि त्यामुळे दिशा मिळते. मी मित्रांचं ऐकायला कमी पडलो याचा परिणाम मला पहिल्या तीन प्रयत्नात दिसून आला.'
आपल्या अंगी असणाऱ्या कौशल्यांकडे दुर्लक्ष करू नका. परीक्षेत जे विषय चांगले आहेत त्यांचाही अभ्यास हवा. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा येत म्हणून कमी अभ्यास केला तर त्याचाही मोठा फटका पेपरला किंवा मुलाखतीसाठी बसू शकतो. अक्षत यांना लेखन कौशल्य खूप चांगलं अवगत असूनही पेपरमध्ये कमी मार्क मिळण्याचं हे कारण असल्याचं त्यांनी सांगितलं.
काही गोष्टी या वेळेवर सोडून द्या- काही गोष्टी या कितीही ओढून ताणून करण्याचा प्रयत्न केल्या तरी मिळत नाही. हा पण प्रयत्न आणि मेहनत अगदी मनापासून 100 टक्के करा. मात्र तरीही अपयश आलं तर काही गोष्टी या वेळेवर सोडून द्या. उशिरा का होईना पण यश नक्की आपलं असू शकतं त्यासाठी संयमाची जोड हवी.