औरंगाबाद, 26 जुलै: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात एक दुर्देवी घटना घडली आहे. शेततळ्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू (Two youth drowned) झाल्याची घटना समोर आली आहे.
मृत दोन्ही युवक सावंगी येथील शेतात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोहताना पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोहंमद अरसलाम नियाजी आणि शेख साजिद शेख याकूब असं मृत युवकांची नाव आहेत.
MH FYJC CET 2021: आजपासून पुन्हा सुरु होतंय CET रजिस्ट्रेशन, वाचा डिटेल्स
पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघांचा बुडून मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन्ही युवकांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढले.
काँग्रेसला धक्का, महाराष्ट्र काँग्रेस उपाध्यक्षांचं कोरोनानं निधन
धक्कादायक म्हणजे गेल्या एका आठवड्यात 8 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यातच पाण्यात बुडून मृत्यूचं सत्र जिल्ह्यात अद्याप सुरुच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Aurangabad News