जेव्हा नवरा लग्नाच्या मंडपात प्रवेश करतो, तेव्हा तो मंडपाबाहेर त्याची चप्पल काढतो.
या दरम्यान, वधूची बहीण किंवा तिचे मित्र-मैत्रिणी नवरदेवाचे शूज गायब करतात.
शुज लपवल्यानंतर ते शुज परत घेण्यासाठी नवऱ्याला मुलीकडच्यांना पैसे द्यावे लागतात. तेव्हाच त्याला आपले बूट परत मिळतात.
याद्वारे नवरदेवाचं व्यक्तिमत्व तपासलं जातं. असं म्हटलं जातं की, एखाद्या व्यक्तीच्या शूजमुळे त्याची अनेक रहस्ये उघड होतात.
जेव्हा मेहुणी आपल्या दाजीचे शुज चोरते, तेव्हा एक प्रकारे ही भावोजीच्या संयमाची परीक्षा असते.
यासोबतच नवरदेव किती हुशारीने त्याच्या मेहुण्यांकडून आपले बूट परत घेऊ शकतो हेही पाहायला मिळतं. ज्यामुळे त्याचा व्यवहारीकपणाही समोर येतो.
शुज लपवण्याच्या विधीमागे आणखी एक तर्क दिला जातो. असे म्हणतात की निरोपाच्या वेळी बहुतेक लोक रडायला लागतात, मग शूज लपवण्याच्या विधीमुळे तेथे आनंदी वातावरण निर्माण होते