NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / रेल्वे स्टेशनवर समुद्रसपाटीपासूनची उंची का लिहिली जाते? तुम्हाला माहितीय यामागचं कारण?

रेल्वे स्टेशनवर समुद्रसपाटीपासूनची उंची का लिहिली जाते? तुम्हाला माहितीय यामागचं कारण?

दररोज कोट्यवधी भारतीय लोक रेल्वेने प्रवास करतात, परंतु फार कमी प्रवाशांना रेल्वेशी संबंधित नियम आणि कायदे माहित असतील. त्यांपैकीच एक आहे प्लॅटफॉर्मवर लिहिली गेलेली समुद्रसपाटीपासूनची उंची.

15

तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल पण कधी विचार केलाय. रेल्वे प्लॅटफॉर्मच्या फलकावर स्टेशनच्या नावानंतर त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची खाली का लिहिली जाते? रेल्वे स्थानकाच्या फलकावर स्थानकाची समुद्रसपाटीपासून उंचीची माहिती देऊन त्याचा उपयोग काय, याचा विचार केला आहे का? ही माहिती प्रवाशांसाठी खरोखर आवश्यक आहे.

25

Mean Sea Level म्हणजे काय? प्रत्येक रेल्वे स्थानकावर, फलाटाच्या सुरुवातीला आणि शेवटी एक मोठा पिवळा बोर्ड असतो, ज्यावर स्थानकाचे नाव आणि त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते. ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रत्येक प्रवासी ते वाचतो. पण त्याचा वापर त्यांना माहित नसतो. जगभरात समुद्राची समान पातळी आहे, त्यामुळे समुद्रसपाटी हा उंची मोजण्यासाठी आधार मानला जातो, इंग्रजीत याला मीन सी लेव्हल म्हणतात.

35

समुद्र सपाटीच्या उंचीसह ट्रेनच्या वेगाचे कनेक्शन आम्ही तुम्हाला सांगतो की समुद्र सपाटीपासून रेल्वे स्टेशनच्या उंचीशी संबंधित माहिती प्रवाशांसाठी नसून ट्रेनच्या लोको पायलट आणि गार्डसाठी आहे. वास्तविक, यामुळे त्यांना ट्रेनचा वेग वाढवणे किंवा कमी करणे या संबंधित निर्णय घेण्यास मदत होते.

45

या माहितीच्या सहाय्याने, ट्रेन ड्रायव्हर सहजपणे ठरवू शकतो की त्याला एवढी चढण चढण्यासाठी इंजिनला किती शक्ती द्यावी लागेल. दुसरीकडे, ट्रेन उतारावर जाताना ड्रायव्हरला किती स्पीड असणे आवश्यक आहे आणि कोणता वेग राखणे आवश्यक आहे हे समजते. म्हणूनच सर्व स्थानकांवर 'समुद्रसपाटीपासूनची उंची' वापरली जाते.

55

याशिवाय रेल्वे स्थानकाच्या फलकावर लिहिलेली ही माहिती महत्त्वाची आहे कारण भारतात जेव्हा रेल्वे स्थानके बांधली जात होती, तेव्हा समुद्रसपाटीपासूनची उंचीची माहिती रेल्वे स्थानके बांधण्यात आणि रेल्वे लाईन टाकण्यासाठी उपयुक्त ठरत होती. त्याच्या आधारावर बांधकाम केल्यास पूराची समस्या टाळता येते.

  • FIRST PUBLISHED :