पावसाळ्यात विविध विषारी प्राणी बिळांबाहेर येतात. त्यामुळे अंधाऱ्या, ओलसर जागेत, नदीकिनारी साप, पाल, मगर, विंचू असे भयानक प्राणी आढळतात. राजस्थानच्या कोटा भागातील आवली रोजडीतल्या एका घरात मध्यरात्री सर्वजण साखरझोपेत असताना भारतातला सर्वात विषारी साप आढळला.
घरातील एक व्यक्ती रात्री पाणी प्यायला उठली. तिला गेटजवळ काहीतरी वळवळताना दिसलं. निरखून पाहिल्यावर साप असल्याचं लक्षात येताच ती घाबरली आणि जीव मुठीत घेऊन आतल्या खोलीत पळाली. आता जाताच सर्पमित्रांशी संपर्क साधला.
सर्पमित्र गोविंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन येताच ते घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा घरात 3 फूट लांब इंडियन करैत प्रजातीचा साप आढळला. हा साप चावल्यास वेळेत उपचार मिळाले नाहीत, तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. कारण नागापेक्षाही तो विषारी असतो. मध्यरात्री येतो आणि व्यक्तीला झोपेतच डसतो. म्हणून त्याला सायलंट किलरसुद्धा म्हणतात.
हा साप मुख्यतः रात्रीच्या अंधारात बिळाबाहेर पडतो. व्यक्ती झोपेत असताना तिच्यावर हल्ला करतो. महत्त्वाचं म्हणजे तो चावल्यावर केवळ डास चावल्यासारखं जाणवतं, मात्र त्याचं विष शरीरात झपाट्याने पसरून झोपेतच व्यक्तीचा मृत्यू होतो. म्हणूनच हा भारतातला सर्वात खतरनाक साप मानला जातो. तो दिसायला अतिशय सडपातळ आणि प्रचंड लांब असतो. त्याच्या काळ्या शरीरावर दोन-दोन पांढरे पट्टे असतात.
करैत साप प्रामुख्याने ग्रामीण भागात आणि जंगल परिसरात आढळतो. देशात घडणाऱ्या सर्पदंशाच्या घटनांमध्ये सर्वाधिक याच सापाचा समावेश असतो. तो चावल्यानंतर 45 मिनिटांमध्ये व्यक्तीचा मुत्यू होतो. 6.5 फूट लांब असलेला हा साप साधारण 10 ते 17 वर्ष जगतो.