तांदळाचे पाणी म्हणजे शिजवलेले किंवा भिजवल्यानंतर उरलेले पाणी, जे आपण सहसा फेकून देतो. अनेक आरोग्य समस्यांसाठी बर्याच वर्षांपूर्वी जपानमध्ये याचा वापर केला जात आहे. हे पाणी जादूपेक्षा कमी नाही. चला जाणून घेऊया याचे फायदे.
तांदळाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोषक तत्व असतात. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असते. त्यामुळे हे प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीराचा थकवा बर्याच प्रमाणात दूर होतो.
तांदळाचे पाणी त्वचेसाठीही फायदेशीर असते. हे अल्ट्रा व्हायलेट किरणांचा प्रभाव आणि संसर्ग कमी करते. त्यामुळे शिजवलेल्या तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावा. यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स निघून जातात.
तांदळाचे पाणी केसगळती किंवा पांढऱ्या केसांची समस्यादेखील कमी करू शकते. यासाठी हे पाणी टाळूवर सुमारे 15 ते 20 मिनिटे लावून ठेवा. नंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवा.
तांदळाच्या पाण्याच्या सेवनाने कर्करोगासारख्या घातक आजारांचा धोकाही कमी होतो. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. हे पचनक्रिया वाढवण्यास मदत करते.
शिजवलेल्या तांदळाचे पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित होते, ज्यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतात. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)