चुकीची जीवनशैली आणि बाहेरचं जेवण खाल्यामुळे अनेकांना लहान वयातच केस गळणे आणि केस पांढरे होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. केस तज्ञ यासाठी अनेक कारणं असतात, असं सांगतात. प्रत्येकाची केस गळण्याची वेगवेगळी कारणं आहेत. पण त्यांपैकी एक म्हणजे चुकीच्या पद्धतीने केस विंचरण्याची सवय.
ओल्या केसांना कंगवा करण्याचे तोटे तज्ज्ञांच्या मते, केस धुतल्याने काही काळ मुळे कमजोर होतात. म्हणून आपण ते कोरडे होण्याची प्रतीक्षा केली पाहिजे आणि त्यानंतरच त्यांना विंचरण्याचा विचार केला पाहिजे.
जर आपण असे केले नाही आणि केस ओले असतानाच फणी फिरवली तर केसांच्या मुळांवर अनावश्यक ताण निर्माण होतो, ज्यामुळे ते कमकुवत होतात आणि गळू लागतात. त्यामुळे केस झपाट्याने गळू लागतात.
कंगवा करण्याची योग्य पद्धत काय? आंघोळीनंतर डोक्यात पाणी आल्याने केस एकत्र चिकटतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशावेळी कंगवा किंवा त्याचे दात जाड असले पाहिजेत. तुमच्या केसांची लांबी कितीही असो, पण कंगवा पूर्णपणे खाली नेण्याऐवजी तुम्ही हळूहळू अर्ध-अर्ध लेवल पर्यंत केस विंचरा. प्रथम 2 भागांमध्ये केस करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर त्यांना विंचरण्यास सुरुवात करा. असे केल्याने केस लवकर तुटत नाहीत.
तुम्ही दिवसातून किती वेळा कंगवा करता? केसात कंगवा करण्यापूर्वी पूर्णपणे वाळवा आणि नंतर त्यांना तेल लावा. असे केल्याने ते तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचते, त्यामुळे केसांना पूर्ण पोषण मिळते आणि ते लवकर तुटणे बंद होते. केस मजबूत ठेवण्यासाठी, त्यांना दिवसातून 2-3 वेळा कंघी करणे आवश्यक आहे. असे केल्याने ते मजबूत राहतात. (नोट : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज १८ लोकमत याची कोणतीही पुष्टी करत नाही.)
(नोट : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज १८ लोकमत याची कोणतीही पुष्टी करत नाही.)