पिरियड पेनची पातळी हृदयविकाराच्या वेदनेसारखी असते. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये महिलांना कामावरून सुट्टी म्हणजेच पिरियड लिव्ह देण्याची चर्चा जगभर होत आहे.
पिरीएड्सच्या कालावधीमध्ये महिलांना होणार असह्य त्रास लक्षात घेता, यादरम्यान सुट्टी मिळणं किती आवश्यक आहे याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. एबीपी माझाने याबद्दल सविस्तर वृत्त प्रकाशित केलं आहे.
तज्ज्ञांच्या मते मासिक पाळी येणे आवश्यक आहे. मात्र पिरीएड्समुळे वेदना, थकवा, मूड बदलणे आणि इतर शारीरिक आणि भावनिक समस्या उद्भवतात ज्यामुळे कामावर परिणाम होतो, ज्या दरम्यान काम करण्याची क्षमता प्रभावित होते.
मासिक पाळीची सुटी मिळाल्यास स्त्रिया या कठीण काळात त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊ शकतात आणि विश्रांती घेऊन स्वतःची काळजी घेऊ शकतात. यामुळे नंतर त्यांची काम करण्याची क्षमता वाढेल.
पिरीएड्स लिव्ह मिळाल्यास या काळात स्वच्छता राखण्यास महिलांना मदत होईल. कारण या काळात महिलांनी त्यांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतल्यास त्या भवीष्यात अनेक घातक आजारांपासून दूर राहू शकतात.
मासिक पाळीदरम्यान जासृ प्रवास करून ऑफिसला जाणे कठीण होते. यादरम्यान अनेकवेळा महिलांना ऑफिसमध्येही सॅनिटरी नॅपकिन्स बाथरूममध्ये घेऊन जाण्यासही थोडे अवघड वाटते.
पिरीएड्सदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो आणि महिलांना अशक्तपणा जाणवतो. महिलांनाच मानसिक व शारीरिक थकवा लक्षात घेता पिरीएड्स लिव्ह मिळणे आवश्यक आहे.