मरीन ड्राईव्ह : पावसाळ्यात मुंबईतील मरिन ड्राईव्ह हे ठिकाण पर्यटकांच्या फार आवडीचे आहे. क्वीन नेकलेस म्हणून ओळखल जाणारं या ठिकाणाचं सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलून येते. आकाशातून पडत असलेल्या पाण्याच्या धारा आणि समोर खवळलेला समुद्र हे दृश्य पहाण्यासाठी बरेच जण मरीन ड्राईव्ह या ठिकाणाला भेट देतात. वेस्टर्न रेल्वे लाईनवर चर्चगेटच्या दिशेने जाणारी ट्रेन पकडून तुम्ही मरीन ड्राईव्ह येथे जाऊ शकता.
बांद्रा बँडस्टँड : मुंबईचा पाऊस आणि विस्तीर्ण पसरलेला अरबी समुद्र हे दृश्य तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही बांद्रा येथील बँडस्टँडला नक्की भेट द्या. याठिकाणी तुम्ही पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटू शकता. वेस्टर्न लाईनवरील बोरीवलीच्या दिशेने जाणारी ट्रेन पकडून तुम्ही बांद्रा येथे पोहोचू.
कार्टर रोड : बांद्रा येथील कार्टर रोड हे मुंबईकरांसाठी पावसाळ्यात फिरण्याचे आवडते ठिकाण आहे. एका बाजूला अरबी समुद्र तर दुसरीकडे चकचकीत कॅफे आणि या दोघांच्या मधून एक चालण्यासाठी पायी मार्ग अशी ही जागा आहे. कार्टर रोड येथे भेट देऊन तुम्ही मुंबईतील पावसाचा आनंद घेऊ शकता.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान : मुंबईतलं सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ आणि हिरवळीसाठी ओळखळं जाणारं बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला या पावसाळ्यात तुम्ही भेट देऊन पावसाचा आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकता. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला मुंबईचं हृदय असंही म्हटलं जातं. घनदाट जंगल, हिरवेगार डोंगर आणि ऐतिहासिक कान्हेरी गुफांमुळं हे उद्यान अनेक पावसाळ्यात अनेक पर्यटकांसाठी आकर्षण ठरत.
कर्नाळा : मुंबई गोवा महामार्गावर असलेले हे ठिकाण पक्षी अभयारण्या म्हणूनही लोकप्रिय आहे. पावसाळ्यात तुम्हाला पक्ष्यांचे थवे पाहायचे असतील हिरवळ अनुभवायची असेल तर तुम्ही तेथे नक्की भेट देऊ शकता.
माळशेज घाट : माळशेज घाट हे हिरवळ आणि निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. पावसाळ्यात तर या घाटाचे सौंदर्य अधिकच खुलते. मुंबई पासून जवळच हा घाट येथे ठाणे, पुणे येथून येणाऱ्यांची संख्या अधिक विकेंडा अधिक असते. तसेच पर्वतारोह्यांसाठी आणि ट्रेकर्ससाठी देखील घाट प्रसिध्द आहे. माळशेज घाटात माळशेज धबधबा, पिंपळगाव जोगा धरण, हरिश्चंद्रगड आणि अजोबा हिल किल्ला हे पाहण्यासारखे आहे.
गेटवे ऑफ इंडिया : गेटवे ऑफ इंडिया हे देखील पावसाळ्यात फिरण्यासाठी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. एका बाजूला गेटवे ऑफ इंडियाची भव्य वस्तू आणि दुसरीकडे अरबी समुद्र आणि आकाशातून होणारा मेघांचा वर्षाव असे दृश्य पहाण्यासाठी पर्यटक पावसाळ्यात गेटवे ऑफ इंडियाला भेट देत असतात.