टेलिव्हिजनवर मालिकांचे पिक आलं आहे. अनेक विषयांच्या मालिका हिंदी तसेच मराठी टेलिव्हिजनवर सुरू आहेत. मालिका पाहत असताना अनेकदा असं वाटतं की आपण हा सीन किंवा ही कथा आधीही कधीतरी पाहिली आहे. हो टेलिव्हिजनवरील अनेक मालिका या बॉलिवूडच्या हीट सिनेमांची कॉपी आहेत. कोणते आहेत सिनेमे आणि मालिका पाहूयात.
2001मध्ये सलमान खान, राणी मुखर्जी आणि प्रिती झिंटा यांचा 'चोरी चोरी चुपके चुपके' हा सिनेमा तुम्हाला आठवत असेल. याच सिनेमाची कॉपी 'दिल से दिल तक' या मालिकेत पाहायला मिळाली.
2010मध्ये आलेली 'दो हंसो का जोडा' ही मालिका चांगलीच प्रसिद्ध झाली. या मालिकेची पहिली झलक पाहिल्यानंतर शाहरूख खान आणि अनुष्काच्या 'रब ने बना दी जोडी' या सिनेमासाठी आठवण होतं. मालिकेत अभिनेता शालिन भानोतचा लुक देखील शाहरुखा ठेवण्यात आला होता.
'रब ने बना दी जोडी' सिनेमाच्या 2 वर्षांनंतर दो हंसो का जोडा मालिका रिलीज करण्यात आली. प्रेक्षकांनी मालिकेला चांगला प्रतिसाद दिला होता.
त्याचप्रमाणे 2016मध्ये आलेली रिताशा राठोड आणि प्रिन्स नरूला यांची 'बढो बहू' ही मालिका आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या 'दम लगा के हईशा' या सिनेमाची कॉपी होती.
या मालिकेचं बॅकग्राऊंड वेगळं होतं पण स्टोरी आणि सीन्स सिनेमाशी फार मिळते जुळते होते. या मालिकेला देखील प्रेक्षकांची चांगला प्रतिसाद दिला होता.
2015मध्ये स्टार प्लसवरील 'नामकरण' ही मालिका देखील चांगलीच गाजली होती. महेश भट्ट यांनी मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं.
'नामकरण' ही मालिका 'जख्म' या सिनेमाची कॉपी होती. मालिकेत रीमा लागू, बरखा सेनगुप्ता, अदिती राठोड प्रमुख भूमिकेत होते.
2008मध्ये आलेली 'वारिस' ही मालिका राम गोपाल वर्माच्या 'सरकार' सिनेमाची कॉपी होती. त्याचप्रमाणे 'सरकार राज' या सिनेमाशी देखील मिळती जुळती होती. वारिस या मालिकेनं TRPमध्ये नेहमी बाजी मारली होती.