स्टार प्रवाहवरील सगळ्याच मालिका जवळजवळ सर्वात जास्त पहिल्या जाणाऱ्या मालिकांच्या यादीत आहेत. पण त्यामध्ये जुनी मालिका म्हणजे 'फुलाला सुगंध मातीचा'. या मालिकेने पहिल्या पाच मालिकांमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे.
कीर्ती आणि शुभमच्या हटके लव्हस्टोरीने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. पण आता सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच कीर्ती आणि शुभम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
आज या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस पार पडला. या दिवशी कलाकार आपल्या लाडक्या व्यक्तिरेखांना निरोप देताना चांगलेच भावुक झाले.
मालिका संपणार समजताच चाहत्यांनी त्याला विरोध केला होता. प्रेक्षकांना मात्र मालिका संपायला नको आहे. मालिका संपणार समजताच प्रेक्षकांनी त्याला विरोध दर्शवला आहे. या पोस्टच्या खाली प्रेक्षकांनी दुसरी मालिका संपवा पण ही नको', 'आम्हाला ही मालिका अजून बघ्याची आहे', 'वेळ बदला पण मालिका बंद करू नका' अशा कमेंट केल्या होत्या.
पण आता कलाकारांनी शूटिंगच्या शेवटच्या दिवशीचे फोटो शेअर केल्याने ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
मालिकेतील कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकरनेही इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. यात ती आयपीएसच्या भूमिकेत फोटो पोस्ट केला होता. त्यावर तिने एकदा शेवटचं असं म्हटलं आहे. यावर तिने स्टार प्रवाह वाहिनीला टॅग केले आहे. त्याबरोबर तिने #किर्ती, #फुलाला सुगंध मातीचा, #प्रेम असे त्यांनी लिहिले होते.
मालिकेत इमिली ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मधुरा जोशी हिने “इमिली म्हणून आजचा शेवटचा दिवस. या प्रवासात मला ज्यांनी साथ दिली त्या प्रत्येकाचे आणि माझ्या सहकलाकारांचे मी आभार मानू इच्छितो. तुम्ही सर्वजण खूपच महान कलाकार आहात. या सर्व भावनिक आणि मजेशीर क्षणांसाठी धन्यवाद. हा प्रवास कायमच माझ्या लक्षात राहिल”, असे म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे.
मालिकेतील कीर्ती आणि शुभमची जोडी, त्यांना घरच्यांची मिळालेली साथ यामुळे मालिका हिट झाली होती. मात्र काही दिवसांपूर्वी मालिकेचं कथानक बदलताच मालिका कंटाळवाणी होत चालली होती. आता लवकरच मालिका निरोप घेणार आहे.