'मन उडू उडू झालं' मालिकेतून अभिनेता अजिंक्य राऊत घराघरात पोहोचला. या मालिकेतील अभिनेत्री हृता दुर्गुळेबरोबरची त्याची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अजिंक्यने त्याच्या आयुष्यातील इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.
अजिंक्यने 'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितल की, माझ्या आयुष्यात एकवेळ अशी होती, जेव्हा माझ्याकडे घराचं भाडं द्यायलाही पैसे नव्हते.
पण मी वाट बघण्याचा निर्णय घेतला. फक्त विविधांगी भूमिका असलेले चांगले प्रोजेक्ट करायचे, असं मी ठरवलं होतं. यादरम्यान मला आर्थिक चणचण भासली. पण, चांगल्या गोष्टी तुमची वाट पाहत असतात, असं देखील अंजिक्य यावेळी म्हणाला.
लॉकडाऊननंतर मला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पण, योग्य संधीची मी वाट पाहत होतो. आणि त्यानंतर मला मन उडू उडू झालं ही मालिका मिळाली. मी कसा आहे, हे या मालिकेमुळे सगळ्यांना कळलं.
विठू माऊली मालिकेत विठ्ठलाची भूमिका साकारल्यानंतर माझ्यातील कलाकाराची दुसरी बाजू प्रेक्षकांना दाखवण्याची संधी मला हवी होती. इंद्रा ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली, याचा मला आनंद आहे, असंही पुढे अजिंक्य म्हणाला.
मराठीतील या चॉकलेट बॉयनं अनेका मालिकांमध्ये काम केलं आहे. अंजिक्यचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.