NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ऐश्वर्याच्या  या 5 सिनेमांचं आपआपसात आहे खास कनेक्शन, एका व्यक्तीनं बदललं आयुष्य

ऐश्वर्याच्या  या 5 सिनेमांचं आपआपसात आहे खास कनेक्शन, एका व्यक्तीनं बदललं आयुष्य

दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रम आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा 'पोनियिन सेलवन 2' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मणिरत्नमच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवलं आहे.

16

बच्चन घराण्याची सून आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉक्स ऑफिसवर तिच्या नावावर अनेक हिट सिनेमे आहेत. गेल्या 26 वर्षांपासून ती बॉलिवूडमध्ये सक्रीय असून आपल्या अभिनयाची जीवावर ती राज्य करत आहे.

26

खरे तर ऐश्वर्याला चित्रपटांमध्ये लाँच करण्याचे संपूर्ण श्रेय दिग्गज चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांनाच जातं. कारण ऐश्वर्यानं 1997 मध्ये आलेल्या 'इरुवर' या तमिळ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं आणि त्यानंतरच ती बॉलिवूडमध्ये दिसली होती. 'प्यार हो गया' या चित्रपटानं तिची एंट्री हिट झाली होती.'

36

दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रम आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा 'पोनियिन सेलवन 2' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मणिरत्नमच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवलं आहे.

46

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्याचा चित्रपट अवघ्या 4 दिवसांत 200 कोटींचा आकडा पार करण्यात यशस्वी ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप प्रेम मिळत आहे, पण तुम्हाला माहित आहे का की ऐश्वर्या रायच्या आणखी 4 चित्रपटांचं या चित्रपटाशी खास नातं आहे, कसं? चला तर मग जाणून घेऊया.

56

दरम्यान, मणिरत्नमने 2007 मध्ये ऐश्वर्यासोबत 'गुरु' हा चित्रपट बनवला होता. ज्यामध्ये अभिषेक बच्चन मुख्य अभिनेता म्हणून दिसला होता. हा चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. ऐश्वर्याचा हा चित्रपट खूप आवडला होता. 'गुरू' या चित्रपटानं ऐश्वर्याच्या फिल्मी करिअरला एका नव्या उंचीवर नेण्याचं काम केलं.

66

यानंतर 2010 मध्ये मणिरत्नमनं ऐश्वर्यासोबत 'रावण' नावाचा आणखी एक चित्रपट केला. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन देखील होता. परंतु या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर चालू शकली नाही. याशिवाय मणिरत्नमने ऐश्वर्याला 'पोनियिन सेल्वन 1' आणि 'पोनियिन सेल्वन 2' मध्ये घेतलं होतं. या चित्रपटाचा पहिला भाग बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. आता याचा दुसरा भागही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. त्यामुळं मणिरत्नमनं ऐश्वर्याचं आयुष्यच बदलून टाकलं असं आपण म्हणू शकतो.

  • FIRST PUBLISHED :