मुंबई, 17 ऑक्टोबर: सध्या महाराष्ट्राचं राजकारण आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघालं आहे. त्यात ईडी हाही मुख्य मुद्दा आहे. शरद पवारांनी निर्देश दिल्यानंतर पात्रता नसतानाही काही बँकांना कर्ज देण्यात आलं होतं असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी ‘न्यूज18 लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यावर आता पवारांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं आहे.