सांगली, 12 एप्रिल : ‘‘राजू शेट्टीला पाडायला भाजप आणि सेना लागत नाही. शरद पवार हे खूप हुशार नेते आहेत. मग ते त्यांना सोडतील का?’’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये भाजप सेनेच्या युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. ‘‘पवारांनी आत्तापर्यंत अनेकांना फसवलंय. वसंतदादा, विखे पाटीलांनंतर आता राजू शेट्टी यांना ये-ये म्हणत त्यांनी पिंजऱ्यात घेतलंय’’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.