पणजी, 10 मार्च : गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल (Goa Assembly Election result 2022) समोर येऊ लागले आहेत. एकूण 40 जागांपैकी ज्या जागांचे कल हाती येत आहे त्यानुसार भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जवळपास समसमान जागांवर आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस (BJP and Congress) या दोन्ही पक्षांकडून इतर पक्षांच्या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आपले आमदार फुटू नयेत यासाठी काँग्रेस पक्षाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या मात्र असे असतानाही भाजपने आपली सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्ष सम-समान जागांवर आघाडी मिळवताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून काँग्रेस पक्षाने आपले आमदार इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसची महाराष्ट्रात फिल्डिंग
गोव्यातील कर्ली क्लब पाडण्यास सुरुवात; याच क्लबमधील पार्टीनंतर झालेला सोनाली फोगटचा मृत्यू
Airplane Emergency Landing : गोवा-हैदराबाद विमानात अचानक धुराचे लोट; Emergency लँडिंग, धक्कादायक VIDEO
मुलीनं केली कमाल! मायक्रोसॉफ्टनं दिलं बंपर पॅकेज; 8-10 लाख नव्हे सॅलरीचा आकडा बघून व्हाल थक्क
मुंबईतून गोवा, कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, लवकरच वाहतूक कोंडी संपणार
पोटात गर्भ वाढत असताना पतीने थेट पत्नीवर घातल्या गोळ्या…, कारण ऐकून बसेल धक्का
आता गोव्यात 'काय हाटील, काय डोंगर'चं सत्र सुरू! काँग्रेस आमदारांना चेन्नईला हलवलं
Goa Politics : काँग्रेस सोडलेले गोव्याचे 7 आमदार अमित शहांच्या भेटीला, मोठ गिफ्ट मिळणार?
संतापजनक! मुंबईत कोरियन मुलीच्या छेडछाडीनंतर गोव्यात विदेशी महिलेसोबत थेट..
गोव्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना, रिसॉर्टमध्ये डच महिलेसोबत भयंकर घडलं
Goa Tourism : गोवा फिरण्यासाठी जातायेत? 'या' ठिकाणी होईल मोफत राहण्याची सोय
घरात न सांगता व्हॅलेटाईन साजरा करण्यासाठी प्रेमी युगुल गोव्याला गेलं अन् परत आलेच नाहीत
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाने आपले आमदार महाराष्ट्रात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात लोणावळा येथे काँग्रेस आपल्या गोव्यातील सर्व नवनिर्वाचित आमदारांना हलवणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असल्याने हे स्थळ सुरक्षित मानले जात आहे आणि त्यामुळेच काँग्रेस पक्षाने आपले आमदार महाराष्ट्रात हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
गोव्यात पोस्टल बॅलटनंतर काय स्थिती?
पोस्टल बॅलटनंतर भाजप - 14 जागांवर आघाडीवर आहे
काँग्रेस - 17 जागांवर आघाडीवर
MGP 4 जागांवर आघाडीवर
तर अपक्ष एका जागेवर आघाडीवर
मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना धक्का
आता एक मोठी बातमी गोव्यातून समोर आली आहे (Goa Election Result Updates). गोव्यातील सांकेलीम मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. कारण या मतदारसंघात मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी यांच्यात चुरशीची लढत आहे. अशात आता या मतदारसंघात प्रमोद सावंत (Pramod Sawant trailing) सध्या पिछाडीवर असल्याचं समोर आलं आहे. सांकेलीम मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी 436 मतांनी आघाडीवर आहेत
40 जागा असलेल्या गोव्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे; मात्र आप, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एमजीपी आदी पक्षांनी यावेळी जोर लावल्यामुळे सर्वांचं लक्ष निकालाकडे आहे. गेल्यावेळी काँग्रेसने गोव्यात सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या; मात्र तरीही सरकार स्थापन करण्यात भाजपला यश मिळालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags:Assembly Election, BJP, Goa, Goa Election 2021, काँग्रेस