सांधे प्रत्यारोपनानंतर रुग्णाला बरं होण्यासाठी 6 ते 8 आठवडे लागतात. त्यामुळे जास्त हालचाल करण्याचा किंवा कोणत्याही प्रकारचे कार्य करण्याचा प्रयत्न करू नका, कारण यामुळे इतर समस्या उद्भवू शकतात. सांधे प्रत्यारोपनानंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे ते जाणून घ्या – वेळेवर डॉक्टरांना भेटणं आणि औषधं घेणं सुरू ठेवा शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून सुट्टी दिल्यावर बर्याच गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. यात, डॉक्टरांनी पुढच्या वेळची दिलेली निश्चित तारीख लक्षात घ्या आणि त्यावेळी जायला विसरू नका. जर शस्त्रक्रियेनंतर औषधं देखील बदलली गेली असतील तर औषधांच्या प्रिस्क्रिप्शनची देखील विशेष नोंद ठेवा. आधारा शिवाय चालू नका चालताना कोणत्याही आधाराशिवाय चालण्याचा प्रयत्न करू नका. चालण्यासाठी काठी किंवा वॉकर वापरणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त जर शस्त्रक्रिया क्षेत्रात सूज किंवा रक्तस्त्राव होत असेल आणि ताप, वेदना, जळजळ आणि थंडपणा आणि पाय पिवळे किंवा निळे दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. शस्त्रक्रिया झालेल्या भागाची काळजी ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया केली गेली आहे, त्या ठिकाणी साबण आणि पाण्याने हळुवारपणे धुवावे आणि स्वच्छ कापडाने हलक्या हाताने कोरडे करावे. शस्त्रक्रिया केलेल्या भागाभोवती लोशन किंवा पावडर लावू शकता, जेणेकरून टाक्यांवर जखम होणार नाही. टाक्यांच्या भागात दोन आठवडे पाणी लागू नये हे लक्षात ठेवा. टाके बरे होण्यासाठी 7 ते 10 दिवस लागू शकतात आणि जर 2 आठवड्यांनंतर टाके निघाले नाहीत, तर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हळुवारपणे खेचले जाऊ शकतात आणि काढू शकतात. या शारीरिक कार्यात विशेष काळजी घ्या
अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - हाड, स्नायू आणि इतर दुखण्याशी संबंधित विकार न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.