मुंबई, 14 डिसेंबर : ‘कौन बनेगा करोडपती 13’ (Kaun Banega Crorepati 13) या शॉमध्ये काही प्रश्न फारच मनोरंजक तर काही विचित्रही असतात. असाच एक रंजक प्रश्न 13 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळाला. या प्रश्नात कार्यक्रमाचे सूत्रधार अमिताभ बच्चन यांनी अशा शहराचं नाव विचारलं होतं, ज्या शहराच्या मेट्रो स्टेशनला लिटिल इंडिया, चायना टाउन अशी काही असामान्य नावं आहेत. यात एक नाव धोबी घाट (Dhoby Ghaut) असेही होतं. गंमत म्हणजे पर्यायांमध्ये एकाही भारतीय किंवा चिनी शहराचे नाव नव्हते. धोबीघाटचे नाव सिंगापूरसारख्या (Singapore) परदेशी शहरात का दिले गेले, यामागे एक रंजक कथा आहे. काय प्रश्न होता सोमवारच्या एपिसोडमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न असा होता की “कोणत्या शहरातील मेट्रो रेल्वे सिस्टीममध्ये लिटिल इंडिया, चायना टाइम, कॅश्यू (काजू) आणि धोबी घाट नावाची स्थानके आहेत” ज्यासाठी स्पर्धकांना चार पर्याय देण्यात आले होते. क्वालालंपूर, हाँगकाँग, सिंगापूर आणि बँकॉक. या पर्यायांमध्ये भारतीय नाव नसल्याने हा प्रश्न कठीण झाला. इंग्रजांनी धोबी आणले होते सिंगापूरमध्ये हे नाव तिथल्या वॉशरमन समुदायामुळे लोकप्रिय झाले. 19व्या शतकात 1819 मध्ये वॉशरमन पहिल्यांदा सिंगापूरमध्ये आले तेव्हा त्याची सुरुवात झाली. त्याला ब्रिटिशांनी भारतीय सैनिकांसह आणले होते. ब्रिटीशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते सेवा बाजाराचा एक भाग बनले. असे म्हणतात की वॉशरमननी त्यांच्या सेवांनी सिंगापूरच्या लोकांवर मोठा प्रभाव पाडला, जो बाकीच्या सेवांमध्ये दिसत नव्हता. या स्टेशनचे नाव का? सिंगापूरमध्ये मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा एक भाग म्हणून भूमिगत रेल्वे स्टेशन बांधले जात असताना, 1987 मध्ये एका स्थानकाला धोबी घाट असे नाव देण्यात आले, स्क्रोलच्या लेखानुसार, धोबीघाट हे नाव एका प्रमुख व्यापारी समुदायाच्या आठवणीत देण्यात आले. सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीचे असोसिएट प्रोफेसर आणि सिंगापूर मधील इंडियन्स 1819-1945 चे लेखक राजेश राय सांगतात की, पहिल्यांदा धोबी घाट MRT स्टेशन असलेल्या स्वच्छ पाण्याच्या नदीजवळ धोबी लोक राहत होते. Tornedo | चक्रीवादळ म्हणजे काय आणि त्याचा हवामान बदलाशी काय संबंध आहे? येथे धोबी समाज काम करत होता या लहान नदीचे नाव सुंगेई बेरस बाशा आहे, ज्याचा मलय भाषेत अर्थ ‘ओल्या तांदळाची नदी’ असा होतो. या नदीच्या काठावर ओला भात बोटीने आणून वाळवला जात असे. हे सिंगापूरच्या धोबी कामाचे ठिकाणही होते. आता ही नदी इथे अस्तित्वात नाही. मात्र, सिंगापूरचे ब्रिटिश संस्थापक थॉमस स्टॅमफोर्ड रॅफल्स यांच्या नावाने हा परिसर स्टॅमफोर्ड कालवा म्हणून ओळखला जातो. बिहार, यूपी आणि चेन्नईहून आले होते धोबी आज हा परिसर ऑर्चर्ड रोडवरील शॉपिंग डिस्ट्रिक्टचा भाग आहे. सिंगापूरला गेलेले धोबी हे उत्तर प्रदेश आणि बिहारचे लोक होते. यासोबतच मद्रासमधून आलेले तमिळ धोबी होते, जी त्या वेळी ब्रिटिशांची वसाहत बनली होती. या परिसराला धोबी समाजाचे नाव देण्यात आले. तमिळमध्ये याला वनन थेरुवु असेही म्हणतात.
इथे स्थायिक झाले नाही आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे सिंगापूरमध्ये शंभर वर्षे काम करूनही वॉशरमन कधीही स्थायिक होण्याच्या उद्देशाने येथे आले नाही. फार कमी धोबी त्यांच्या कुटुंबासह येत असत. तर बाकीचे पुरुष फक्त तीन-चार वर्षांसाठी यायचे आणि त्यांची जागा त्यांच्या कुटुंबातील दुसर्या सदस्याला सोडायचे. औरंगजेब ते अहिल्याबाई होळकर, काशी विश्वनाथ मंदिर उभारणी आणि विध्वंसाची कहाणी आज सिंगापूरमध्ये धोबीघाटाचा मागमूसही नाही. काही राहिलं असेल तर ते फक्त नाव. धोबीघाट मेट्रो स्टेशनच्या बाहेर पडताना इथे दुकाने दिसतात. खाद्यपदार्थ आणि कला साहित्याची अधिक दुकाने आहेत. याशिवाय काही म्युझियम्स आणि मॉल्स देखील आहेत ज्यात मोठ्या ब्रँड्सचे आउटलेट आहेत.