मेघा घाडगे
मुंबई, 24 ऑगस्ट: बिग बॉस मराठी सीझन 4 सध्या टेलिव्हिजनवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. तब्बल 3 आठवड्यांनी घरातील सदस्यांचे खरे चेहरे समोर आले आहेत. घरात तिसऱ्या आठवड्यात दुसऱ्या सदस्य घराबाहेर पडला आहे. रविवारी अभिनेत्री मेघा घाडगेनं बिग बॉस च्या घराचा निरोप घेतला. किरण माने, अमृता देशमुख आणि मेघा यांच्यातून मेघा घाडगे ला कमी वोट मिळाल्यानं मेघा घराबाहेर पडली. घरातून बाहेर येताच मेघानं घरातील सदस्यांना किरण मानेपासून दूर रहा, असा सूचक सल्ला दिला. मात्र मेघा घरातून बाहेर पडल्यानंतर केवळ किरण मानेच नाही तर योगेश चव्हाणबद्दलही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. योगेशचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण पाहिलं तर तिसऱ्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्कमध्ये मेघा आणि योगेश यांच्यात कडाक्याची भांडण झाली. योगेशचा राग अनावर झाल्यानं त्यानं सदस्यांचा बाप काढला. यावरून मेघा आणि योगेशमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. न्यूज 18लोकमतशी एक्सक्लुसिव्ह बातचित करताना मेघानं मात्र योगेशचं सत्य बाहेर आणलं आहे. त्याचप्रमाणे बिग बॉसच्या घरात झालेल्या अर्ध्या गोष्टी टेलिव्हिजनवर दाखवण्यात आल्याचं नाही असंही मेघा म्हणाली. हेही वाचा - Bigg Boss Marathi 4: ‘या माणसापासून सावधान राहा’; एलिमिनेट होताच मेघाचा सदस्यांना सूचक सल्ला योगेशबद्दल बोलताना मेघा म्हणाली, “योगेशचा पहिल्या दिवसापासून तोंडावर ताबा नाहीये. दरवेळी मी त्याला सावध केलं आहे. तू जे काही बोलतोस ते सगळेच ऐकून घेऊ शकत नाही. तु बोलताना जे बोलतो ते तोंड सांभाळून बोलत जा. कारण तू जे बोलतोस ते मनाला लागतं. हे मी त्याला बोल्ले. पण तो काय बोलला हे नाही दाखवलं गेलं नाही. ज्यामुळे मी हर्ट झाले त्यामुळे मी त्याला बोलले. पण त्या गोष्टीच दाखवण्यात आल्याच नाहीत”.
मेघा पुढे म्हणाली, “योगेश दरवेळी पैशात गोष्टी मोजायचा. दरवेळी ताई पैसे पाहिजेत का? नाचून दाखवता का? हे बरोबर होत का? ताई मी पैसे देतो हे करून दाखवणार का? तो मला असही म्हणा ला की, ताई मला 1 लाख रूपये द्या मी तुमच्याबद्दल चांगलं बोलतो. असं सतत चालत होतं. त्याचा त्याच्या तोंडावर ताबा नाहीये. एकदा मी त्याला म्हटलं होतं की योग्या भूक लागली आहे पण अजून जेवण तयार नाहीये. तेव्हा मला म्हणाला होता की, भूक ना मग कुत्र्यासारखं. ही त्याची भाषा होती. या खूप हर्ट करणाऱ्या गोष्टी होत्या. अशा त्याच्या अनेक गोष्टी बाहेर येत होत्या. त्याचा रागावर कंट्रोल नव्हता. त्याला उकसवलं की उकसायचा.
खूप लोकांना तो बापावरून बोलला होता. सतत एखाद्याला बापावरून बोलणं योग्य नाही. मांजरेकरांनीही त्याला त्यावरून सक्ती दिली, असही मेघा म्हणाली.