मुंबई, 13 मे : साधारण शेतकरी (farmer) आपल्या शेतातील एक हंगामी पीक काढल्यानंतर त्यांची मशागत करत असतो. दरम्यान या मशागती मध्ये नांगरटीसोबत इतर कामे करतो यानंतर तो शेताचा दर्जा वाढवण्यासाठी रासायनिक खतांच्या (chemical fertilizer) ऐवजी शेणखत, मासोळी खत किंवा कोंबडी खतांचा (poultry fertilizer) वापर करत असतो. यामध्ये कोंबडी खताला उष्णता जास्त असल्याने कोंबडी खत चांगल्या प्रमाणात शेतीसाठी उपयुक्त असते यामुळे शेत जमिनीची उत्पादन क्षमता वाढत असते.
रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमिनींचा दर्जा घसरत चालला आहे. सेंद्रिय खतांचा (organic fertilizer) वापर त्यासाठी वाढवताना कोंबडी खताचे मूल्य समजून घेणे गरजेचे असल्याचे कृषी भरारीचे संचालक सुनिल लडे यांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी रासायनिक खतांच्या वापर करतात ते शेतकरी देखील शेत तयार करत असताना सुरवातीला गांडूळ खत किंवा शेणखत किंवा कोंबडी खत (poultry fertilizer) वापरतात.
सेंद्रिय खत असो वा पोल्ट्री खत (poultry fertilizer) वा पिकांची टाकाऊ पाने वा अवशेष असोत, त्यांचा वापर केल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते याचे महत्त्व आता पुन्हा एकदा अधोरेखित होऊ लागले आहे. शेतकरी त्यांच्या वापरावर नव्याने भर देताना दिसत आहे. विकसित देशांमधील शेतकरी याबाबत अधिक जागरूक असून सेंद्रिय खतांचा वापर वाढविल्याने रासायनिक खतांच्या वापरात दहा टक्क्यापर्यंत बचत करणे त्याला शक्य झाले आहे.
पोल्ट्री खत पॅलेट स्वरूपात आपल्याला 5 ते 25 किलोच्या बॅगेत त्याचे रूपांतर करता येते. पोल्ट्रीचा व्यवसाय करणारे शेतकरी तर आपल्या शेतातील वापरासाठी त्याचा वापर करू शकतात. या खतामध्ये नत्र, स्फुरद व पालाश हे मुख्य घटक असतातच शिवाय त्यात कॅल्शिअम हा घटकही असतो. ते मुळातच सेंद्रिय असल्याने त्याचे कंपोसिंटग करण्याची गरज भासत नाही. त्याचा शेतात थेट वापर करता येतो.
सुकवलेल्या एक टन "केज पोल्ट्री खता'चे मूल्य हे 100 किलो युरिया, 150 किलो सुपर फॉस्फेट, 50 किलो पोटॅश, 125 किलो कॅल्शिअम कार्बोनेट, 30 किलो गंधक, दहा किलो मॅग्नेशिअम सल्फेट, पाच किलो फेरस सल्फेट एक किलो मॅंगेनीज सल्फेट, झिंक सल्फेट आदी व अन्य अंशात्मक घटकांएवढे असते. बाजारातील अन्य खतांच्या तुलनेत त्याची किंमतही कमी आहे. त्याचा वापर वाढवणे गरजेचे आहे.
ऊस शेतीसाठी कोंबडी खत अत्यंत उपयुक्त
जमिनीची सुपीकता घटत चालल्याचे मुख्य उदाहरण पाहण्यास मिळते ते ऊस शेतीत. या पिकामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन संकल्पना राबवणे गरजेचे झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शेणखत, कंपोस्ट किंवा प्रेसमड यांचा वापर त्यासाठी महत्त्वाचा आहे. तागासारखे हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणून घेऊन लागवडीनंतर सुमारे 30 ते 45 दिवसांनंतर त्याचा वापर खत म्हणून करण्याची पद्धत आता अनक शेतकरी वापरू लागले आहेत. उसाच्या पानांमध्ये लोह किंवा जस्ताची कमतरता आढळल्यास फेरस सल्फेट व झिंक सल्फेटचा वापर करणे गरजेचे आहे. अझोस्पिरीलम आणि फॉस्फोबॅक्टेरिया यांचा वापरही तितकाच महत्त्वाचा असल्याचे तज्ज्ञ म्हणतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.