उन्हाळ्यात लोक मोठ्या प्रमाणात नारळ पाणी पितात. हे आरोग्यदायी आहे तसंच त्यात पौष्टिक मूल्यही आहे. आता तर डॉक्टरही सर्वांना नारळपाणी पिण्याचा सल्ला नक्कीच देतात.
नारळाच्या पाण्यात काही पोषक घटक असतात, ज्यात बी व्हिटॅमिन रिबोफ्लेविन (बी2), नियासिन (बी3), पॅन्टोथेनिक ऍसिड, फॉलिक ऍसिड, बायोटिन, तसेच थायामिन (बी1), व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि सोडियम यांचा समावेश होतो. त्यात काही साधे कार्बोहायड्रेट (शर्करा) आणि अमीनो ऍसिड देखील असतात.
नारळ पाणी अनेक पोषक तत्वांचा एक चांगला स्रोत आहे. मधुमेहाने त्रस्त लोकांसाठी हा रामबाण उपाय आहे. किडनी स्टोन टाळण्यास मदत होऊ शकते. हृदयरोग्यांसाठीही ते फायदेशीर आहे.
वर्कआउट दरम्यान आणि नंतर पिण्यासाठी नारळ पाणी हे एक उत्तम पेय आहे. हे इलेक्ट्रोलाइट्स आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे जे आपल्या ऊर्जेची पातळी त्वरित वाढवतं. यामुळे थकवा आणि निर्जलीकरण टाळता येतं. कोणत्याही स्पोर्ट्स ड्रिंकसाठी नारळ पाणी हा नैसर्गिक पर्याय आहे. हायड्रेशनचा एक मधुर स्त्रोत मानला जातो.
नारळातील पाणी अनेकदा दोन ग्लासांपेक्षा जास्त असतं. ते पिण्यास चवदार आणि मजेदार असतं. पण नारळ सर्व बाजूंनी बंद असताना त्यात पाणी येतं कुठून याचा कधी विचार केला आहे?
नारळ हे जगातील एकमेव फळ असेल, ज्यामध्ये इतके पाणी असते. वास्तविक, नारळाच्या आतील पाणी, जे आपण पितो, तो वनस्पतीचा एंडोस्पर्म भाग आहे. नारळाचे झाड त्याचे फळ पाण्याचा साठा म्हणून वापरते.
हे पाणी झाडाच्या मुळांद्वारे गोळा करून फळांच्या आतील भागात वाहून नेले जाते, फळांच्या पेशींद्वारे ते फळामध्ये आणले जाते.या पाण्यात एंडोस्पर्म विरघळल्यावर ते घट्ट होऊ लागते. जेव्हा नारळ पिकण्यास सुरवात होते, तेव्हा हे पाणी देखील हळूहळू कोरडे होऊ लागते आणि एंडोस्पर्म घन अवस्थेत पांढर्या रंगात बदलते, जे खाल्ले जाते.
कच्च्या हिरव्या नारळात असलेले एंडोस्पर्म हे अणू प्रकारचे असते. रंगहीन द्रव म्हणून उद्भवते. नंतरच्या अवस्थेत, ते पेशींसह कडांवर जमा होतात, जे काही काळानंतर जाड पांढर्या थराच्या रूपात बनतात.शेवटी, नारळाचा कर्नेल तयार होतो. (सर्व फोटो- विकी कॉमन्स)