वास्तुशास्त्रात गुलाबाच्या रोपाला खूप महत्त्व दिले आहे.
वास्तूमध्ये गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. तर ज्योतिषशास्त्रात त्याचा संदर्भ देवी लक्ष्मीशी आहे.
वास्तुशास्त्रानुसार, घरात गुलाब लावल्याने सौंदर्य टिकते तसेच सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो
जर तुमच्या लव्ह लाईफमध्ये काही समस्या असतील तर तुम्ही गुलाबाशी संबंधित काही सोपे उपाय करून त्यापासून मुक्ती मिळवू शकता.
वास्तुशास्त्रानुसार, जेव्हा तुम्ही तुमच्या घरात गुलाबाचे रोप लावाल तेव्हा ते दक्षिण-पश्चिम दिशेला लावावे
या दिशेला गुलाबाचे रोप लावल्याने घराच्या मालकाची सामाजिक प्रतिष्ठा वाढते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)