1. पैसे-कर्ज घेणे-देणे टाळा: शुक्रवार हा धनाची देवता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी कोणाशीही पैशाचे व्यवहार करू नयेत, असे मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी पैसे उधार-कर्जाऊ दिल्यानं लक्ष्मीचा कोप होतो. यामुळे संपत्तीची हानी होऊ शकते.
2. मांसाहार-दारू सेवन टाळा : शुक्रवारी मांसाहार करू नये. यासोबतच या दिवशी मद्यपानही टाळावे. शुक्रवारी पूर्ण सात्विक भोजन घ्यावे. शक्य असल्यास शुक्रवारी घरी सात्विक भोजन करण्याची सवय लावा. या दिवशी मांस आणि मद्य सेवन केल्याने घरात अशांतता येते.
3. कोणाशी गैरवर्तन करू नका: शुक्रवारी कोणाशीही भांडणे किंवा शिवीगाळ करणे टाळा. या दिवशी अपशब्द वापरल्यानं देखील माता लक्ष्मी क्रोधित होते, असे मानले जाते.
4. साखर देण्यास मनाई : शुक्रवारी कोणालाही उसनी साखर देऊ नये, असे मानले जाते. असे केल्याने शुक्र ग्रह कमजोर होतो. शुक्राच्या प्रभावामुळेच आपल्या जीवनात सुख-समृद्धी येते. शुक्र ग्रह कमजोर असेल तर सुख-समृद्धी नष्ट होते. त्यामुळे घरात गरिबी येते.
5. घर अस्वच्छ असू नये : तसं घर दररोज स्वच्छ ठेवलं पाहिजे. मात्र, शुक्रवारी चुकूनही घरात अस्वच्छता ठेवू नये. असे मानले जाते की, ज्या घरात घाण असते त्या घरात लक्ष्मीचा वास राहत नाही. माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते. म्हणूनच विशेषत: शुक्रवारी घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)