NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Vastu Tips: श्रीमंत असणारेही होतात कर्जबाजारी; या सवयी माणसाला कंगाल बनवतात

Vastu Tips: श्रीमंत असणारेही होतात कर्जबाजारी; या सवयी माणसाला कंगाल बनवतात

Vastu Tips Marathi: वास्तू दोष हे आपल्या जीवनातील त्रास आणि संकटांचे एक प्रमुख कारण मानले जातात. हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे अनेक नियम सांगण्यात आले आहेत, ज्यांचे दैनंदिन जीवनात पालन केले पाहिजे. असे न केल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. सकाळी उठल्यापासून घरातील वस्तूंची देखभाल करताना झालेल्या चुकांमुळे माता लक्ष्मी क्रोधित होऊ शकते. ज्यामुळे एखाद्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया ज्योतिषाचार्य विनोद सोनी पोद्दार यांच्याकडून, दैनंदिन जीवनात कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, ज्यामुळे घरात दारिद्र्य येऊ शकते.

18

1. सूर्योदयानंतर उठणे: सूर्योदयाच्या वेळी किंवा त्यापूर्वी उठणे शुभ मानले जाते. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. असे मानले जाते की, सूर्योदयानंतर उठल्याने घरामध्ये दरिद्रता येते.

28

2. पाणी वाया जाणे : घरातील नळ किंवा टाकीतून पाणी टपकणे, नाहक पाणी वाहून जाणे, शुभ मानले जात नाही. यामुळे तुम्हाला घरामध्ये आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

38

3. या दिवशी केस कापणे : गुरुवारी आणि एकादशीला केस आणि नखे कापणे अशुभ मानले जाते. यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. त्यामुळे घरात आर्थिक संकट येऊ शकते.

48

4. खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू: खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात ठेवू नयेत, यामुळे धनहानी होते असे मानले जाते. वेळीच त्या भंगारात घालाव्या.

58

5. सूर्यास्तानंतर या गोष्टी देऊ नका: सूर्यास्तानंतर दूध, दही किंवा पैसे कोणालाही देणे अशुभ मानले जाते. यामुळे घरातील धनाची हानी होते, त्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.

68

6. खराब चप्पल घरात ठेवणे : तुटलेली चप्पल घरात ठेवणे अशुभ मानले जाते. तसेच फाटलेले जुने कपडे घरात ठेवू नका. हे अशुभ मानले जाते. ते एखाद्याला दान करा किंवा त्यांची योग्य विल्हेवाट लावा.

78

7. धूळ साचणे: धनाची देवी लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते. घरातील अस्वच्छतेमुळे पैशाची हानी होते. घरातील वस्तूंमध्ये धूळ आणि घाण साचणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात गरिबी येते.

88

8. पूजा न करणे : हिंदू धर्मात पूजा, जप आणि व्रताचे महत्त्व सांगितले आहे. पण घरात पूजा-व्रत न केल्यास माता लक्ष्मी क्रोधिक होते. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे गरिबीला सामोरे जावे लागू शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :