पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा वाढता संसर्ग आणि प्रादूर्भाव रोखण्यासाठी मध्यरात्रीपासन लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. त्यानंतर फक्त जीवनावश्यक सेवा, वस्तू मिळणार आहेत असे सांगितले.
जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी लोकांची दुकानांबाहेर मोठ्याा प्रमाणात गर्दी होऊ लागली. ह्या गर्दीतून पुन्हा कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी म्हणून अंतर ठेवा असं वारंवार सांगूनही लोक ऐकत नाहीत हे पाहून सरकार आणि दुकानदारांकडूनच भन्नाट आयडीया वापरण्यात आली.
दुकानांबाहेर चौकोनी बॉक्स करून किंवा रांगोळीचे गोल आखण्यात आले. दोन चौकोनात एक ते दोन वीत अंतर सोडण्यात आलं आहे. या गोलामध्ये नागरिकांना उभं राहायला सांगितलं जात आहे.
जसा नंबर येईल तसा एक एक गोल पुढे सरकायचं अशा पद्धतीनं नियम पाळला जात आहे. लोकांनीही या मोहीमेला चांगली साथ दिली आहे.
गुजरात, दिल्ली असा अनेक शहरांमध्ये अशा पद्घतीनं सोशल डिस्टन्स बाऴगण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. वारंवार सांगूनही नागरिक ऐकत नसल्यानं अखेर अशा पद्घतीनं अवलंब करावा लागत आहे.
देशात कोरोनानं अक्षरश:थैमान घातलं आहे. आतापर्यं 510 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील सर्वाधित म्हणजे 110 हून अधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळल्याची माहिती मिळत आहे.
कोलकाता इथली काही खास छायाचित्र