राज्यभरात पावसाने धुमशान घातले असून कोकणात परिस्थितीत आणखी चिंताजनक होत चालली आहे. त्यातच हवामान खात्याने पुढील 4 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
कोकणात सलग दोन दिवस अतिवृष्टी आणि जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने दिनांक 23 ते 27 तारखेपर्यंत राज्यातील हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.
24 आणि 25 तारखेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाण्यात अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
तसंच, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.