२६ जानेवारी हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा देशात 71 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. देशाची राजधानी दिल्लीत राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
दिल्लीतील रायसीनी हिल पासून संचलनाला सुरूवात होते. त्यानंतर राजपथ, इंडिया गेटमधून लाल किल्ल्यापर्यंत हे संचलन केले जाते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान तयार करण्यात आले. त्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले.
संविधान 26 जानेवारी 1950 ला सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी लागू करण्यात आले.
भारतीय संविधानाच्या दोन प्रती हाताने लिहण्यात आल्या होत्या. हिंदी आणि इंग्रजी भाषेत ते लिहलं होतं. भारतीय संविधानाच्या हस्तलिखित प्रती संसद भवनात ठेवण्यात आल्या आहेत.
पूर्ण स्वराज्य दिवस (26 जानेवारी, 1930)आठवणीत ठेवूनच भारतीय संविधान 26 जानेवारीला लागू करण्यात आलं होतं.
26 जानेवारी 1950 रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाते.
पंतप्रधान देशासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना अमर ज्योती स्मारक येथे श्रद्धांजली वाहतात.