मुंबई, 8 ऑगस्ट: आयपीएल स्पर्धेनंतर लगेच टी20 वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे. आयपीएलमधील काही जणांच्या खराब कमगिरीमुळे टी20 वर्ल्ड कपसाठी योग्य टीम निवडली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. टी20 वर्ल्ड कपसाठी निडण्यात आलेल्या सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांची कामगिरी निराशाजनक झाली आहे. तर शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर यांनी जोरदार कामगिरी करत निवड समितीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. (AFP)
शार्दुल ठाकूरच्या कामगिरीनं सर्वांनाच प्रभावित केलं आहे. इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या शार्दुलनं यूएई लेगमधील 7 मॅचमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत. तो चेन्नई सुपर किंग्सचा सर्वात यशस्वी बॉलर आहे. हार्दिक पांड्या सध्या बॉलिंग करत नाही. शार्दुल त्याचा चांगला पर्याय ठरला असता. शार्दुलची बॅटींग देखील उपयुक्त आहे. इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉननंही शार्दुलचा समावेश करण्याची मागणी केली आहे. (AFP)
श्रेयस अय्यर दुखापतीमुळे सहा महिने क्रिकेटपासून दूर होता. या आयपीएलमध्ये त्यानं तीन मॅचमध्ये महत्त्वपूर्ण खेळी करत दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून दिला आहे. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांचा फॉर्म पाहता त्या जागी श्रेयस नक्कीच सरस ठरला असता. (AFP)
आरसीबीच्या युजवेंद्र चहलनं युएई लेगमध्ये 6 मॅचमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत. टी20 वर्ल्ड कपमध्ये निवड समितीनं चहलच्या ऐवजी राहुल चहरला पसंती दिली आहे. राहुलनं चार मॅचमध्ये फक्त 2 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर त्याला ड्रॉप करण्यात आले. (PTI)
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दोन मॅच हार्दिक पांड्या फिटनेसमुळे खेळू शकला नव्हता. त्यानंतरच्या मॅचमध्ये त्यानं बॉलिंग केलेली नाही. हार्दिक हा टीम इंडियातील एकमेव फास्ट बॉलर ऑल राऊंडर आहे. तो बॉलिंग करत नसल्यानं टीम इंडियाच्या संतुलनावर परिणाम होणार आहे. (AFP)
भारतीय टीम: विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी