देशात 11 राज्यांमध्ये जवळपास वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे, याचं कारण पश्चिम बंगालच्या खाडीत तयार होणारं चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळाचे परिणाम देशातील राज्यांवर होणार असल्याचं सांगितलं जात आहे. हवामान विभागाने याबाबत महत्त्वाचा अलर्ट दिला आहे.
2023 वर्षातील पहिलं चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये येणार असल्याचं सांगितलं जात आहे. 6 मे रोजी पश्चिम बंगालच्या खाडीत हे चक्रीवादळ धडकेल असा अंदाज आहे.
पूर्वी भारताचा भाग ते म्यानपर्यंत या चक्रीवादळाचे परिणाम पाहायला मिळू शकतात. त्यामुळे या चक्रीवादळाचे अलर्ट देण्यात आले आहेत.
या कालावधीमध्ये समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर समुद्रकिनाऱ्याजवळच्या गावांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक बोलवली होती. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर NDRF आणि आपात्कालीन टीमला देखील सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर तर मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, नांदेड, लातूर तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात पावसाची शक्यता आहे.
चक्रीवादळ 6 मे रोजी येईल अशी शक्यता आहे. मात्र सध्या 11 राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. ऐन उन्हाळ्यात नद्या नाले दुथडी भरून वाहात आहेत.