NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / PHOTOS: 'बिपरजॉय'ने सोडल्या विध्वंसाच्या खुणा; कित्येक संसार उघड्यावर, 1 हजार गावं अंधारात

PHOTOS: 'बिपरजॉय'ने सोडल्या विध्वंसाच्या खुणा; कित्येक संसार उघड्यावर, 1 हजार गावं अंधारात

Cyclone Biparjoy : 'बिपरजॉय' या चक्रीवादळामुळे गुरुवारी गुजरातच्या किनारी भागात प्रचंड नुकसान झाले आहे. या वादळाला बंगाली भाषेतून नाव देण्यात आले आहे, ज्याचा अर्थ 'आपत्ती' आहे. या वादळामुळे सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र भागात प्रचंड नुकसान झाले आहे. शेकडो विजेचे खांब कोसळले असून 1,000 हून अधिक गावांची बत्ती गुल झाली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चक्रीवादळामुळे राज्यात एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही, ही “सर्वात मोठी गोष्ट” आहे.

110

'बिपरजॉय'चा अर्थ बंगाली भाषेत आपत्ती होतो. चक्रीवादळाची जखाऊ बंदराजवळ धडकण्याची प्रक्रिया गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजता सुरू झाली आणि शुक्रवारी पहाटे अडीच वाजेपर्यंत सुरू राहिली. यादरम्यान संपूर्ण कच्छ जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. चक्रीवादळामुळे ताशी 140 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले. समुद्राच्या पाण्याने सखल भागातील गावांमध्ये पूर आला. (एपी)

210

राज्याचे मदत आयुक्त आलोक कुमार पांडे यांनी पत्रकारांना सांगितले की, 'बिपरजॉय चक्रीवादळामुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. राज्यासाठी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आमच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.” ते म्हणाले की पश्चिम गुजरात विज कंपनी लिमिटेडचे ​​मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे 5,120 विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. ते म्हणाले की, किमान 4,600 गावांमध्ये वीज नाही पण 3,580 गावांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. (एएफपी)

310

मांडवीजवळील कचा गावात सुमारे 25 कच्च्या घरांचे नुकसान झाले. गेल्या चार दिवसांपासून विविध गावांतील 400 लोकांना निवारागृहात ठेवण्यात आले आहे. मांडवी शहरात सुमारे 30 झाडे आणि 20 विद्युत खांब उन्मळून पडले. मांडवीचे रहिवासी अब्दुल हुसेन म्हणाले, 'काल दुपारी 4 वाजल्यापासून आमच्याकडे वीज नाही. घरांची छप्परे उडून घरांमध्ये पाणी साचले. (एएफपी)

410

चक्रीवादळ राज्यात पुढे सरकत असताना, बनासकांठा आणि पाटण जिल्ह्यांतील अधिकारी सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत. भारतीय हवामान खात्याने (IMD) दोन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.

510

बनासकांठा जिल्हा दंडाधिकारी वरुण बरनवाल यांनी सांगितले की, 2,500 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून सखल भागातून अधिक लोकांना बाहेर काढले जात आहे. ते म्हणाले, 'आम्ही अन्नाची 25,000 पाकिटे तयार ठेवली आहेत.' IMD ने सांगितले की गुजरातच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे घरांचे आणि रस्त्यांचे नुकसान होऊ शकते आणि उत्तर गुजरातमधील जिल्ह्यांमध्ये झाडे उन्मळून पडू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. (एएफपी)

610

राज्यात किमान 600 झाडे उन्मळून पडली असून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. झाडे पडल्याने तीन राज्य महामार्ग बंद करण्यात आले आहेत. अहवालानुसार एकूण 581 झाडे उन्मळून पडली आहेत. 9 पक्क्या, 20 कच्च्या घरांचे नुकसान झाले असून 65 झोपड्या उद्ध्वस्त झाल्या आहेत, तर दोन पक्क्या आणि 474 कच्च्या घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. (एएफपी)

710

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) महासंचालक अतुल करवाल यांनी शुक्रवारी दिल्लीत पत्रकारांना सांगितले की बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातला धडकल्यानंतर कोणतीही जीवितहानी झाली नाही. (एपी)

810

एनडीआरएफचे महासंचालक म्हणाले की, राज्यातील किमान एक हजार गावांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यापैकी 40 टक्के वीज संकट एकट्या कच्छ जिल्ह्यात आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी, NDRF च्या 18 तुकड्या गुजरातमध्ये झाडे तोडण्याचे यंत्र आणि बोटीसह तैनात आहेत. (एपी)

910

चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुंबईत पाच आणि कर्नाटकात चार पथके तैनात करण्यात आली आहेत. चक्रीवादळ आता दक्षिण राजस्थानकडे सरकत आहे आणि एनडीआरएफने राज्य सरकारशी सल्लामसलत करून जालोरमध्ये आधीच एक टीम तैनात केली आहे. मुसळधार पावसामुळे पुराचा धोका असून लोक अडकण्याची शक्यता आहे. (एपी)

1010

चक्रीवादळामुळे ताशी 140 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले आणि समुद्राच्या पाण्याने सखल भागातील गावांमध्ये पूर आला. (एपी)

  • FIRST PUBLISHED :