नवी दिल्ली, 19 जून: भविष्यामध्ये एक फिक्स्ड इन्कम (Fixed Income)मिळावा अशी अपेक्षा प्रत्येकाची असते. तुम्ही देखील भविष्यात आर्थिक तंगीपासून वाचण्यासाठी प्रयत्न करत असाल तर मोदी सरकारकडून देण्यात येणाऱ्या योजनांमध्ये (Central govt scheme) गुंतवणूक करू शकता. काही विशिष्ट वर्गासाठी विविध योजना देण्यात येत आहेत. अशाच एका स्कीमबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यातून कमी गुंतवणूक करून तुम्ही चांगला रिटर्न मिळवू शकता
मोदी सरकारच्या पेन्शन योजनांमध्ये सर्वात खास आहे पंतप्रधान श्रमयोगी योजना (PM-SYM). मोदी सरकारच्या विशेष योजनेमध्ये दरमहा 55 रुपयांची गुंतवणूक करत आहात, तर तुम्हाला साठाव्या वर्षानंतर 36000 रुपये पेन्शन स्वरूपात मिळतील.
या योजनेमध्ये असंगठित क्षेत्रामध्ये काम करणारी कोणतीही व्यक्ती जोडली जाऊ शकते. या व्यक्तीचे वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असणे बंधनकारक आहे त्याचप्रमाणे त्याचे मासिक उत्पन्न 15000 पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
या योजनेत मिळणारी 36000 रुपये पेन्शन दरमहा 3000 अशा स्वरुपात मिळेल. या योजनेचा फायदा 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मिळत आहे. याकरता 3.52 लाख कॉमन सर्व्हिस सेंटर देखील आहेत.
अशाप्रकारे मिळवा लाभ- तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तुम्ही PM-SYM खातं उघडू शकता. यासाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक यासारखे दस्तावेज असणं आवश्यक आहे. या योजनेत खातं उघडल्यानंतर अर्जदाराला श्रम योगी कार्ड (Shram Yogi Card) देखील जारी केलं जात.
या योजनेमध्ये वयवर्ष 60 नंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 200 रुपये महिन्याच्या महिन्याला भरावे लागतील. जर 18 व्या वर्षी तुम्ही या योजनेबरोबर जोडले गेलात तर तुम्हाला 55 रुपये प्रति महिना गुंतवणूक करावी लागेल, तेच जर तुम्ही 29 व्या वर्षी या योजनेशी जोडले गेलात तर प्रति महिना 100 रुपये आणि वयाच्या 40 व्या वर्षी जोडले गेलात तर दर महा 200 रुपयाचे अंशदान तुम्हाला करावे लागेल.
केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना दरमहा काही पैसे गुंतवावे लागतील. या योजनेद्वारे वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर सरकार गुंतवणूकदारांना दरमहा 3 हजार रुपयांच्या पेन्शनची हमी देते. या योजनेद्वारे गुंतवणूकदारास आजीवन पेन्शन मिळते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आपण या योजनेत जितके योगदान देता तेवढेच योगदान सरकार आपल्या खात्यात दिले आहे.