NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / PM Kisan: योजनेसाठी हे शेतकरी आहेत अपात्र, 2000 रुपयांचा लाभ मिळाला असल्यास परत घेतले जाणार पैसे

PM Kisan: योजनेसाठी हे शेतकरी आहेत अपात्र, 2000 रुपयांचा लाभ मिळाला असल्यास परत घेतले जाणार पैसे

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा नववा हप्ता (9th Installment of PM Kisan Scheme) जारी करण्यात आला आहे. दरम्यान काही अपात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

110

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षाला 6000 रुपये पाठवण्यात येतात. 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हे पैसे पाठवले जातात. दरम्यान या योजनेचा नववा हप्ता (9th Installment of PM Kisan Scheme) जारी करण्यात आला आहे. दरम्यान 9 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पोहोचली आहे

210

सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे थेट पाठवले आहेत. मात्र अद्यापही काही शेतकरी असे आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही, शिवाय असेही काही आहेत जे अपात्र असून त्यांना 2000 रुपये खात्यात जमा झाले आहेत

310

या शेतकऱ्यांना लाभार्थी नसूनही या योजनेचा लाभ घेतला आहे. ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने पीएम किसान योजनेचा (PM KISAN) फायदा उचलला आहे, त्यांच्याकडून हे पैसे वसूल करण्याचं काम सरकारने सुरू केलं आहे. अनेक राज्य सरकारांनी अशा लोकांना रिकव्हरी नोटीस (Recovery Notice) जारी करून वसूली सुरू केली आहे. जाणून घ्या कोणते शेतकरी या योजनेसाठी अपात्र आहेत...

410

PM Kisan चा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:ची जमीन असणं आवश्यक आहे. तुम्ही दुसऱ्याची जमीन भाड्याने घेऊन कसत असाल तरी या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर शेतजमीन वडील किंवा आजोबांच्या नावावर असेल तरी या योजनेचा फायदा घेता येणार नाही. अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असेल तर त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील

510

केंद्र सरकार/ राज्य सरकार आणि PSUs मध्ये सध्या काम करत असणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ /चतुर्थ वर्गीय आणि ग्रुप डी कर्मचारी सोडून) या योजनेसाठी अपात्र आहेत

610

असे शेतकरी कुटुंब ज्यामधील एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती पुढील श्रेणीत येतात ते या योजनेसाठी अपात्र आहेत- व्यावसायिक डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सीए, आर्किटेक्ट

710

घटनात्मक पदावरील शेतकरी, आजी आणि माजी मंत्री, लोकसभा आणि राज्यसभा खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष हे सर्व या योजनेच्या बाहेर आहेत

810

केंद्र आणि राज्य सरकारमधील 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील शेतीसाठी या योजनेचा लाभ मिळत नाही.

910

एकाच कुटुंबातील अनेक लोकं या योजनेचा वेगवेगळा फायदा घेऊ शकत नाहीत. आपल्यासह पती-पत्नी, भाऊ-बहीण यांच्यासाठी योजनेचा लाभ घेतला तर ही रक्कम वसूल केली जाईल

1010

मागील वर्षात आयकर भरणारे शेतकरी देखील या योजनेच्या बाहेर आहेत. त्यामुळे अशांनी देखील योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल. याशिवाय चुकीची माहिती देऊन योजनेचा फायदा घेणाऱ्यांकडून देखील रक्कम परत घेतली जाईल.

  • FIRST PUBLISHED :