ठाणे जिल्ह्यात बुधवारी (19 जुलै) सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. यामुळे अंबरनाथ-बदलापूर रेल्वे वाहतूक सकाळी ठप्प झाली आहे. त्याचबरोबर उल्हासनगरलाही पावसाचा दणका बसला आहे.
सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे वालधुनी नदी आणि उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.
उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं आजूबाजूच्या चाळीतील घरातही पाणी शिरलंय.
शहरातल्या सीएचएम कॉलेजजवळही पाणी साचलंय. या कॉलेजकडं जाणाऱ्या पुलाच्या रस्त्यावर पाणी साचलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा घरचा रस्ता पकडावा लागला.
अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे.
अंबरनाथ शहरातून जाणारा कल्याण बदलापूर राज्य महामार्ग पाण्याखाली गेला आहे.