NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Shiv Rajyabhishek 2023: शिवरायांच्या जीवनातील या 10 घटना माहिती आहेत का? PHOTOS

Shiv Rajyabhishek 2023: शिवरायांच्या जीवनातील या 10 घटना माहिती आहेत का? PHOTOS

छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा आज साजरा होत आहे. शिवरायांच्या जीवनातील 10 महत्त्वाच्या घटना पाहा.

  • -MIN READ

    Last Updated: June 06, 2023, 11:54 IST
111

छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा आज साजरा होत आहे. शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग मराठी माणसाला आजही प्रेरणादायी वाटतात.

211

शिवरायांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी येथे फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला.

311

शहाजीराजेंनी जिजाऊ आणि शिवबा यांना बंगरुळला बोलावून घेतले. शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजेही तिथेच होते.

411

आदिलशाही सरदार मुरार जगदेवाने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवून गाव उजाड केले. शहाजीराजांनी आपल्या जहागिरीची जबाबदारी शिवरायांवर सोपवली होती. त्यामुळे इथे शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला. गुंड-पुंडांचा बंदोबस्त केला.

511

शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी सवंगड्यांसोबत भोर तालुक्यातील रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली.

611

पुण्याजवळील रांझेच्या पाटलांनी परस्त्रीवर अत्याचार केल्याचं समजताच शिवरायांना राग अनावर झाला. चौकशी करून पाटलाचे हात-पाय तोडण्याची शिक्षा दिली.

711

जावळीच्या चंद्रराव मोरे याने शिवरायांशी शत्रूत्व घेतले. तेव्हा शिवरायांनी मोरेंचा बंदोबस्त करून जावळी परिसराची व्यवस्था लावली.

811

जावळीच्या मोरेंचा पराभव झाल्यावर विजापूरचा मातब्बर सरदार अफझल खान स्वराज्यावर चाल करून आला. शिवरायांनी प्रतापगडावर त्याचा बंदोबस्त केला.

911

अफझल खानाच्या वधानंतर शिवरायांनी पन्हाळा जिंकला. तेव्हा खवळलेल्या आदिलशहाने सिद्दी जोहरला स्वराज्यावर चाल करून पाठवले. बाजीप्रभू देशपांडे यांनी लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणत घोडखिंड लढवली.

1011

शिवराय विशाळगडावर सुखरूप पोहोचावेत म्हणून बाजीप्रभूंनी घोडखिंड लढवली. सिद्धीच्या फौजांशी लढतानाच बाजीप्रभू धारातीर्थी पडले. घोडखिंड पावन झाली.

1111

इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, सिद्दी सारख्या परकीय सत्तांना शह देण्यासाठी शिवरायांनी मराठा आरमार उभारले. दुर्गाडी किल्ल्याजवळ खाडीच्या किनाऱ्यावर आरमारी गोदी उभारली.

  • FIRST PUBLISHED :