गडचिरोली जिल्ह्यामध्ये काल रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला आहे.
त्यामुळे आलापल्ली भामरागड मार्ग बंद झाला आहे. नदी नाल्याला पुर आल्याने जिल्ह्यातील 8 मार्ग बंद झाले आहेत.
दक्षिण गडचिरोली भागात पावसाचा जोर अधिक असल्याने भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
छत्तीसगडमधील संजय सरोवरचे पाणी सोडल्या कारणामुळे येथील नदीला पूर आलेला आहे.
नदी नजीक राहणाऱ्या लोकांना आधीच सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सर्वत्र जोरदार पडत असलेल्या पावसाने गडचिरोली जलमय झाले असून रस्ते पूर्णतः पाण्याखाली गेले असल्याने प्रवसाचा मार्गच बंद झाला आहे.