NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / कोरोनानंतर 5 जिल्ह्यांमध्ये नव्या आजाराचं थैमान; पाहा यात तुमचा जिल्हा तर नाही ना?

कोरोनानंतर 5 जिल्ह्यांमध्ये नव्या आजाराचं थैमान; पाहा यात तुमचा जिल्हा तर नाही ना?

कोरोना रुग्णसंख्या घटल्यानंतरही या जिल्ह्यांची चिंता कायम आहे. आता इथं नव्या आजाराचा प्रकोप झाला असून परिस्थिती भयंकर आहे.

110

कोरोनावर नियंत्रण मिळत असतानाच आता नव्या आजाराचं संकट उभं ठाकलं आहे. कोरोना रुग्णसंख्या घटत असताना म्युकरमायकोसिसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे.

210

आतापर्यंत एकूण 2113 प्रकरणांची नोंद झाली आहे. तर 120 मृत्यू झाले आहेत. फक्त 213 रुग्ण बरे 1780 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

310

राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये म्युकोरमायसिसने शिरकाव केलेला आहे. 7 जिल्ह्यांची परिस्थिती तर भयंकर आहे.

410

म्युकोरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू पुण्यातच आढळले आहेत. 620 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 29 रुग्ण बरे झाले असून 564 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

510

पुण्यानंतर नागपूर, नांदेड, मुंबई, अहमदनगर, सांगली या जिल्ह्यात अनुक्रमे 240, 142, 118, 116, 101 रुग्णांची नोंद झाली आहे.

610

तर 4 जिल्ह्यांत 100 पेक्षा कमी पण 50 पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. यामध्ये औरंगाबाद - 81, बीड - 69, ठाणे - 75, सोलापूर - 54, वर्धा 62 रुग्ण आहेत.

710

एकूण 20 जिल्ह्यांत म्युकरमायकोसिसने बळी घेतले आहेत. पुण्यात 27 तर नांदेडमध्ये 22 सर्वाधिक मृत्यूची नोंद आहे.

810

ठाण्यात 10, बीडमध्ये 8 आणि सोलापुरात 7, मुंबई शहर आणि उपनगरात अनुक्रमे 5, 6 मृत्यू झाले आहेत.

910

कोल्हापूर-साताऱ्यात प्रत्येकी 5, जळगावात 4, अहमदनगर-वाशिममध्ये प्रत्येकी 3 रुग्णांचा जीव गेला आहे.

1010

तर गोंदिया, रत्नागिरीत प्रत्येकी दोन आणि चंद्रपूर, वर्धा, यवतमाळमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे.

  • FIRST PUBLISHED :