NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Monsoon Kitchen Tips : पावसाळ्यात मिठ आणि साखरेला पाणी सुटतं? मग 4 सोप्या टिप्स फॉलो करा

Monsoon Kitchen Tips : पावसाळ्यात मिठ आणि साखरेला पाणी सुटतं? मग 4 सोप्या टिप्स फॉलो करा

पावसाळा सुरु झाल्याने वातावरण दमट होऊन अनेक खाद्यपदार्थ खराब होऊ लागतात. पावसाळ्यात पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून महिला उन्हाळ्यात पदार्थ वाळवून ठेवतात, परंतु काही असे पदार्थ आहेत जे वाळवता येत नाहीत. पावसाळ्यात अधिकतर किचनमधील मीठ आणि साखरेला पाणी सुटतं आणि त्यात ओलावा तयार होतो. तेव्हा अशावेळी हे पदार्थ खराब होऊ नये आणि त्यातील ओलावा निघून जावा यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करा.

15

पावसाळ्यात साखर आणि मीठ हे प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये न ठेवता काचेच्या बरण्यांमध्ये ठेवा. याशिवाय साखर किंवा मीठ काढत असताना नेहमी सुक्या हाताने काढा. ओल्या हाताने पदार्थ काढताना तो ओलावा जर पदार्थाला लागला तर ती ओली होते.

25

साखरेला ओलसरपणा येऊ नये यासाठी साखरेच्या डब्यामध्ये तांदळाचे काही दाणे टाका. साखरेत किंवा मिठामध्ये तांदळाची पुरचूंडी टाकून त्यामध्ये ठेवून द्या. यामुळे त्यामध्ये तयार झालेला ओलावा शोषला जाईल आणि साखर किंवा मिठामध्ये ओलावा राहाणार नाही.

35

साखर आणि मीठ दीर्घकाळ टिकवण्यासाठी ब्लोटिंग पेपरचाही वापर केला जाऊ शकतो.

45

ब्लोटिंग पेपर ओलावा खेचून घेण्यासाठी मदत करतो. त्यामुळे बरणीमध्ये मीठ किंवा साखर भरण्यापूर्वी बरणीत ब्लोटिंग पेपर घाला. एवढंच नाही तर बिस्कीट, कुकीज आणि चिप्स मऊ पडू नयेत म्हणून देखील तुम्ही ब्लोटिंग पेपरचा वापर करू शकता.

55

पावसाळ्यामध्ये साखरेला आणि मिठाला ओलसरपणा येऊ नये म्हणून साखरेमध्ये सात-आठ लवंग टाकून ठेवा. यामुळे त्याला ओलसरपणा सोबतच मुंग्या देखील येणार नाहीत.

  • FIRST PUBLISHED :