आयुर्वेदानुसार आपण नेहमी संतुलित आहार घेतला पाहिजे आणि शरीराच्या प्रकृतीनुसार आहार घेतला पाहिजे. आयुर्वेदामध्ये गोड, खारट, आंबट, कडू, तिखट आणि तुरट असे सहा प्रकारच्या चवींचे वर्णन केले आहे. एखाद्याने आपल्या शरीराच्या प्रकृतीबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर स्वतःसाठी आहार चार्ट तयार करावा.
भाज्या शिजवताना हे लक्षात ठेवले पाहिजे की त्या खूप जास्त शिजवू नयेत आणि अगदी कच्च्याही ठेवू नयेत. गोडामध्ये साखरेच्या जागी मध किंवा गुळाचा वापर करावा, मैद्याऐवजी कोंडा पीठ वापरावे.
आल्याचा छोटा तुकडा तव्यावर गरम करून त्यात काळे मीठ टाका. यानंतर, जेवण करण्यापूर्वी पाच मिनिटे खा. यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि भूकही चांगली लागते.
आयुर्वेदात असे सांगितले आहे की अन्न नेहमी भुकेच्या अर्ध्या प्रमाणात खाल्ले पाहिजे, जेणेकरून ते चांगले पचते. याशिवाय अन्न नेहमी ताजे खावे आणि चांगले चावून खावे. जेवताना बोलू नका.
जेवणादरम्यान पाणी पिऊ नये, पण जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवणानंतर अर्धा तास पाणी प्यायल्यास ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणाच्या दरम्यान आवश्यक असल्यास, एक किंवा दोन घोट पाणी प्या. याशिवाय पाणी सामान्य तापमानाचे किंवा कोमट असावे. फ्रीजचे थंड पाणी पिऊ नका. तसेच, पाणी घोट-घोट घेऊन पिणे हे अमृतसारखे आहे असे म्हटले जाते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)