NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / नारळ पाण्याला उगीच म्हणत नाहीत अमृत! उन्हाळ्यात आरोग्यासाठी आहेत इतके सगळे फायदे

नारळ पाण्याला उगीच म्हणत नाहीत अमृत! उन्हाळ्यात आरोग्यासाठी आहेत इतके सगळे फायदे

Benefits of drinking coconut water: उन्हाळ्यात जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा उन्हाचा तडाखा आणि उष्ण वाऱ्यामुळे आपल्या शरीरातील पाणी घामाच्या रूपाने बाहेर पडते. अशा परिस्थितीत अनेक वेळा आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे नारळ पाणी पिणे. नारळाचे पाणी शरीराला हायड्रेट तर ठेवतेच पण आपले वजनही नियंत्रित राहते. नारळ पाणी पिण्याचे फायदे आपल्या त्वचेवर दिसून येतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी नारळ पाणी अमृत मानले जाते. हे नैसर्गिक पाणी रक्तदाब नियंत्रित करते. उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचे फायदे () जाणून घेऊयात.

16

- हृदय निरोगी - MedicalNewsToday नुसार, नारळ पाणी हृदयाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यात पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. यामध्ये आढळणारे पोटॅशियम उच्च रक्तदाब आणि हृदयरोगींसाठी खूप फायदेशीर आहे.

26

- हाडांना ताकद देते - नारळाचे पाणी केवळ उच्च रक्तदाब नियंत्रित करत नाही, तर हाडांशी संबंधित अनेक आजारांवरही त्याचा फायदा होतो. नारळाच्या पाण्यात कॅल्शियम असते, जे दात आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे.

36

- वजन कमी करण्यासाठी - ज्या लोकांना लठ्ठपणाची समस्या आहे, त्यांना नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नारळाच्या पाण्यात फॅटचे प्रमाण खूपच कमी असते आणि त्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटते.

46

- त्वचेवर चमक आणते - नारळ पाणी प्यायल्याने शरीरासोबतच आपली त्वचाही हायड्रेट राहते. त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या आपोआप कमी होतात. नारळपाणी प्यायल्याने त्वचा तर सुधारतेच पण पिंपल्स आणि रॅशेससारख्या समस्याही कमी होतात.

56

- पचनास उपयुक्त - नारळाच्या पाण्यात फायबर आणि मॅग्नेशियम सारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. जे पोटाशी संबंधित समस्यांमध्ये खूप फायदेशीर आहेत. नारळाच्या पाण्याचे दररोज सेवन केल्याने बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीसह पोटाच्या इतर समस्यांपासून सुटका मिळते.

66

- मुतखड्याचा धोका कमी - होतो ज्या लोकांना मुतखड्याची समस्या आहे ते देखील नारळाच्या पाण्याचे सेवन करू शकतात. यामध्ये असणारे पोषक घटक किडनीमध्ये स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :