NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Explainer / Indira Gandhi Death Anniversary: आयर्न लेडीबद्दल या रंजक गोष्टी तुम्हाला माहीत नसतील; शेवटची सर्वात वादग्रस्त

Indira Gandhi Death Anniversary: आयर्न लेडीबद्दल या रंजक गोष्टी तुम्हाला माहीत नसतील; शेवटची सर्वात वादग्रस्त

31 ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी केली जात आहे. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या देशाच्या आयर्न लेडीबद्दलच्या रंजक गोष्टी.

17

देशात अशा अनेक सशक्त स्त्रिया झाल्या आहेत, ज्यांनी आपल्या अभूतपूर्व योगदानातून आणि कार्याने इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरलं आहे. आज जाणून घेणार आहोत देशाच्या एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी. इंदिरा गांधींनंतर देशाला एकही महिला पंतप्रधान मिळालेला नाही. इंदिरा म्हणजे स्त्री शक्तीचे अतुलनीय प्रतीक. पंतप्रधान म्हणून त्यांच्या कठोर निर्णयांनी संपूर्ण देशात क्रांती घडवून आणली होती. 31 ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी केली जात आहे. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या देशाच्या आयर्न लेडीबद्दलच्या रंजक गोष्टी.

27

इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या घरी झाला. राजकीय घराण्यातील इंदिराजींनाही मोठी राजकीय दूरदृष्टी होती. वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी इंदिराजींनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध मुलांची वानर सेना स्थापन केली होती. 1938 मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये औपचारिकपणे सामील झाल्या. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाल्यावर इंदिरा गांधी त्यांच्यासोबत काम करू लागल्या.

37

इंदिरा गांधींना राजकारणाचा वारसा लाभला होता. वडिलांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षात इंदिरा गांधींची प्रतिष्ठा वाढली. इंदिराजी देशाच्या नेत्या म्हणून समोर आल्या. लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात त्यांना माहिती आणि प्रसारण मंत्री करण्यात आले. 1966 मध्ये शास्त्रींच्या निधनानंतर इंदिरा गांधींना देशाच्या पंतप्रधानपदाची संधी मिळाली. 'गुंगी गुडिया' म्हणणाऱ्या इंदिरा गांधींनी पंतप्रधान झाल्यानंतर असे निर्णय घेतले, ज्याचे प्रतिध्वनी जगभर पोहोचले.

47

इंदिरा गांधींनी बँकांचे लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. 1966 मध्ये भारतात फक्त 500 बँक शाखा होत्या. पण, सामान्य माणसाला बँकेत पैसे जमा करता येत नव्हते. त्यांचा हा निर्णय देशाच्या विकासात अभूतपूर्व होता. मात्र, त्यांच्या या निर्णयावर बरीच टीका झाली.

57

इंदिरा गांधी सत्तेत आल्यानंतर या महिलेला रोखणे अवघड आहे, हे लोकांना समजले. काँग्रेस सिंडिकेटने इंदिराजींना पदावरून हटवण्याची तयारी सुरू केली. पक्ष फोडून इंदिराजींनी हा खेळ त्यांच्यावरच उलटवला. त्यांचा हा निर्णय राजकारणाच्या काळातील सर्वात दबंग आणि हिटलरवादी निर्णय मानला गेला.

67

भारतापासून वेगळे झाल्यानंतर पाकिस्तानने घुसखोरी करण्याचे धोरण सुरू केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंगाली निर्वासित भारतात येऊ लागले. त्यावेळी पाकिस्तानला अमेरिकेचा पाठिंबा होता. पण इंदिराजींनी कुणालाही न घाबरता पूर्व पाकिस्तानवर हल्ला करून तो भाग मुक्त करून बांगलादेशची निर्मिती केली.

77

इंदिराजींच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि वादग्रस्त निर्णय म्हणजे आणीबाणी. 1971 मध्ये, निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला, तेव्हा अलाहाबाद उच्च न्यायालयाने 1975 च्या लोकसभा निवडणुका रद्द केल्या. इंदिराजींवर 6 वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती. संधीचा फायदा घेत विरोधकांनी इंदिराजींच्या राजीनाम्याची मागणी केली. पण इंदिराजींनी विरोध, न्यायालय आणि परिस्थितीच्या विरोधात देशात आणीबाणी जाहीर केली. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आली. अनेक मोठे बदल झाले.

  • FIRST PUBLISHED :