मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित होय.
तेजस्विनी पंडित अभिनयानंतर आता 'बांबू' सिनेमाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे.
दरम्यान अभिनेत्रीने एका माध्यमाला मुलाखत दिली होती. यामध्ये तिने आपल्या खाजगी आयुष्यातील एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. पाहूया अभिनेत्री नेमकं काय म्हणाली.
वडापाव आणि मुंबई यांचं एक खास नातं आहे. अनेक लोक तीन वेळचं जेवण म्हणून वडापाव खाऊ शकतात. सर्वसामान्य लोकांपासून ते सेलेब्रेटींपर्यंत सर्वजण चवीने वडापाव खाताना दिसतात.
तेजस्विनीने प्लॅनेट मराठीच्या या मुलाखतीमध्ये खुलासा करत सांगितलं की तिने काही वर्षांपूर्वी वडापाव खाणं सोडून दिलं आहे.
अभिनेत्रीने पुढे सांगितलं की, तिने आपल्या एका मित्रासाठी वडापाव खाणं सोडलं आहे, कारण तो मित्र आता या जगात नाहीय. अभिनेत्रीच्या या खुलाश्याने सर्वच भावुक होत आहेत.
तेजस्विनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
तेजस्विनीच्या चाहत्यांना तिच्या प्रत्येक पोस्टची भुरळ पडत असते.