शाहरूख खानची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. बॉलिवूडचा किंग खान त्याच्या सिनेमा इतकाच त्याच्याशी संबंधीत Controversy मुळं चर्चेत असतो. मात्र संकंट कितीही मोठ असो शाहरूख नेहमी त्याचा धिटानं सामना केला आहे.
शाहरूख खानचा नुकताच पठाण सिनेमा आला. सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
पण शाहरूखचा हा सिनेमा येण्यापूर्वीच त्याला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.
कधी धर्मावरून तर कधी दिपीकाच्या बिकीनीच्या रंगावरून पठाण सिनेमाला ट्रोल केलं ..पण शाहरूखनं प्रकरण संयमानं हाताळलं.
शाहरूख नेहमीप्रमाणे या प्रकरणात काही न बोलता शांत राहिलं. खरं तर त्याचं शांत राहणं हेच यावर उत्तर होतं.
शाहरूखचा मुलगा प्रकरण ड्रग्ज केसमध्ये अडकला होता. तेव्हा देखील शाहरूखवर सातत्याने टीका केली जात होती.
मुलगा जेलमध्ये असताना देखील त्यानं याप्रकरणाचा कसालाही बाऊ न करता प्रकरण शांतपणे हाताळलं. शेवटी आर्यन तुरूंगातून निर्दोष बाहेर पडला.
आयपीएलवेळी देखील त्याच्यावर टीका झाली पण प्रत्येक प्रकरणात त्यानं संयम दाखवला.
मोठा स्टार होणं अवघड नाही तर ते स्टारडम ठिकवूण ठेवणं अवघडं आहे. शाहरूखनं देखील या त्याच्या एका गुणामुळं त्याचं स्टारडम टिकवून ठेवलं आहे.