NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / जुन्या मराठी मालिका घेणार एक्झिट; तर 'या' 5 नव्या मालिकांची होणार एन्ट्री!

जुन्या मराठी मालिका घेणार एक्झिट; तर 'या' 5 नव्या मालिकांची होणार एन्ट्री!

झी मराठीवर एक-दोन नव्हे तर तब्बल 5 नव्या मालिका एन्ट्री करणार आहेत.

16

झी मराठीवर नव्या मालिकांचं जणू पेवचं फुटलं आहे. या काही दिवसांत अनेक नव्या मालिकांचे प्रोमो आपल्याला पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे चाहते उस्तुक झाले आहेत. तर आपल्या कोणत्या लाडक्या मालिका निरोप घेणार यांची रुखरुखही लागली आहे. मात्र झी मराठीवर एक-दोन नव्हे तर तब्बल 5 नव्या मालिका एन्ट्री करणार

26

30 ऑगस्टपासून रात्री 9 वाजता 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' ही मालिका आपल्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो पाहूनचं चाहते खुश झाले आहेत. मालिकेमध्ये अभिनेत्री अमृता पवार मुख्य भूमिकेत आहे. मात्र अभिनेता कोण असणार याबद्दल खुलासा झालेला नाहीय.

36

लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे पुन्हा नव्या मालिकेसह आपल्या भेटीला आली आहे. 30 ऑगस्टपासून संध्याकाळी 7.30 वाजता 'मन उडु उडु झालं' या झी वरच्या मालिकेत ती आपल्याला दिसणार आहे. यामध्ये 'विठूमाऊली' फेम अभिनेता अथर्व राऊतसुद्धा दिसणार आहे.

46

तर संध्याकाळी 7 वाजता 'मन झालं बाजिंद' ही मालिकासुद्धा येणार आहे. यामध्ये गावाकडील पार्श्वभूमीवर आधारित कथा पाहायला मिळणार आहे.

56

तसेच 16 ऑगस्टपासून रात्री 10.30 वाजता 'ती परत आलीये' ही गूढ मालिका आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळे 'देवमाणूस' ही मालिका आपला निरोप घेणार असल्याचं निश्चित झालं आहे.

66

तर रात्री 8.30 वाजता 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका आपल्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता श्रेयश तळपदे खूप वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

  • FIRST PUBLISHED :