'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून राणा-अंजली अर्थातच हार्दिक जोशी-अक्षया देवधर घराघरात पोहोचले होते.
या दोघांची जोडी इतकी लोकप्रिय झाली होती की, त्यांनी खऱ्या आयुष्यातसुद्धा एकत्र यावं असं चाहत्यांना वाटतं होतं.
आणि अगदी असंच घडलं, हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता.
सध्या हार्दिक आणि अक्षया आपल्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहेत.
नुकतंच अक्षया आणि हार्दिकने सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये दोघेही विदेशात सुट्टीचा आनंद घेताना दिसून येत आहेत.
अक्षया आणि हार्दिक एकेमकांच्या डोळ्यात हरवलेले दिसत आहेत.
या जोडप्याचे रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.