राज्यातील नव्या कोरोना रुग्णांनी आज 45 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दिवसभरात तब्बल 47827 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
विशेष म्हणजे नव्या कोरोना रुग्णांचं प्रमाण हे बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त आहे. दिवसभरात 24,126 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. याचा अर्थ नव्या रुग्णांची संख्या ही बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या जवळपास दुप्पट आहे.
राज्यात आज 202 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 1.91% इतका आहे.
आतापर्यंत एकूण 29,04,076 कोरोनाबाधितांची नोंद झाली, त्यापैकी 3,89,832 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यात जिल्ह्यात पुन्हा एकदा दिवसभरात उच्चांकी 9086 कोरोना रूग्णवाढ झाली आहे. दैनंदिन मृत्यू संख्याही 58 वर पोहोचली आहे. पुणे शहरात 4653, पिंपरी-चिंचवडमध्ये 2463 तर ग्रामीण भागात 1383 नवे रुग्ण सापडले. एकट्या पुणे शहरात 37 हजार 126 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा तब्बल साडे पाच लाखांवर पोहोचला आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा लक्षणीयरित्या वाढतो आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिकमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात तर आज कोरोना रुग्णांनी उच्चांक 24 तासांत 1,108 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पहिल्यांदाच हा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आता अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 9,235 झाली आहे. दिवसभरात 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये 2,463 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1,507 जण रुग्ण बरे झाले आहेत.
जालन्यातही कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाला आहे. 24 तासांत 493 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि 9 मृत्यूची नोंद झाली आहे. सर्वाधिक 222 रुग्ण जालना शहरातील आहेत. ग्रामीण भागात सर्वाधिक 41 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मंठा तालुक्यातील आहेत. जालन्यात एकूण 27367 कोरोनाबाधितांपैकी 4464 वर उपचार सुरू आहेत.
वाशिममध्ये जितके नवे कोरोना रुग्ण आढळले तितकेच रुग्ण बरेही झाले आहेत. जिल्ह्यात 301 नव्या कोरोना रुग्ण सापडले तर 306 जण कोरोनामुक्त झालेत. आतापर्यंत एकूण 13852 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या 2658 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण रुग्णांची संख्या 16699 आणि एकूण मृत्यू 188 आहेत.
रत्नागिरीत शिमगोत्सवानंतर रुग्णांची आकडेवारी वाढली आहे. जिल्ह्यात 155 नव्या रुग्णांची भर पडल्यानंतर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 519 वर गेली आहे. रत्नागिरीतच सर्वात जास्त 56 रुग्ण सापडले. एकूण 11,262 कोरोनाबाधित आहेत, 377 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
विदर्भातही कोरोनाने थैमान घातलं आहे. नागपुरात एकाच दिवसात 60 मृत्यूची नोंद झाली आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे. 4108 नवे कोरोना रुग्ण सापडले तर 3214 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यानंतर एकूण रुग्ण संख्या 233776, एकूण बरं होणाऱ्यांची संख्या 187751 आणि एकूण मृत्यू संख्या 5218 झाली आहे.
अमरावतीतही कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज 275 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 4 रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात 453 रुग्णांनी केली कोरोनावर मात केली. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या 45366 वर पोहोचली आहे. आता एकूण 49198 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि एकूण 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 3151 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
चंद्रपुरात 24 तासांत 297 नवे रुग्ण आणि 2 मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्ण 28407, एकूण कोरोनामुक्त 25569, अॅक्टिव्ह रुग्ण 2407 आणि एकूण मृत्यूची संख्या 431 आहे.
नांदेडमध्ये गेल्या 24 तासांत 1247 रुग्ण, 23 जणांचा मृत्यू तर 983 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 45276 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.33636 बरे झाले तर 843 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 10558 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 153 रुग्ण गंभीर आहेत.