मुंबई, 1 जून : मागच्या काही वर्षांत राज्याच्या कोणत्या ना कोणत्या भागाला पुराच्या (flood) संकटाचा सामना करावा लागला आहे. पूर आणि भूस्खलनाचा (flood and landslide) सामना करण्यासाठी कायमस्वरूपी दरड कोसळण्याचा धोका असलेल्या गावांच्या पुनर्वसनासंबंधी धोरण (Village Rehabilitation Policy) लवकरच मंजूर होणार असल्याची माहिती पुनर्वसन (Minister Vijay Vadettiwar) मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसला आहे. 2019 आणि 2021 या वर्षांत झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांत दरडी कोसळून शेकडो जणांचा मृत्यू झाला होता. (landslide villages)
दरम्यान मंत्री वडेट्टीवार म्हणाले कि, दरड कोसळणाऱ्या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होणार आहे. राज्यातील १४ जिल्ह्यात सॅटेलाईट फोन, ६९ ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडू शकतात अशा ठिकाणी कायमस्वरूपी गावांचे पुनर्वसन होणार आहे. ज्या जिल्ह्यात पूर येतो अशा जिल्ह्यांना ११६ बोटी व १८ मदत व शोध कार्यासाठी अत्याधुनिक वाहने उपलब्ध करून दिली आहेत. ज्या ठिकाणी वीज पडते अशा ठिकाणी वीज अटकावासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवल्या जाणार आहेत.
हे ही वाचा : Monsoon Update : मान्सून महाराष्ट्राच्या दारात; एंट्रीसाठी कधीचा मुहूर्त साधणार
तसेच सर्व जिल्ह्यांसाठी स्टेट ऑफ आर्ट उपग्रह संप्रेषण व्यवस्था, जीआयएससक्षम, आर्टिफिशल इंटेलिजन्स आधारीत निर्णयासाठी सहाय्यभूत ठरणारी व्यवस्था निर्णय घेणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल. जीव आणि मालमत्तेचे रक्षण करण्याच्या दृष्टीने प्रभावी प्रतिसाद आणि निर्णय घेणे यामुळे शक्य होणार आहे. असे मंत्री वडेट्टीवार म्हणाले.
वडेट्टीवार म्हणाले कि, आपत्ती कालावधीत शून्य मृत्यूदर हे शासनाचे ध्येय असून, आपत्ती प्रतिसाद यंत्रणा (Incidence Response System) ही राज्यात लागू करण्यात येत आहे. आपत्तीत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणामध्ये योग्य तो समन्वय राहावा यासाठी ही यंत्रणा काम करणार आहे.
हे ही वाचा : झपाटलेल्या बेटाची अजब कहानी ! एकाचवेळी या आयलँडवर झाला होता 1 लाख 60 हजार लोकांचा मृत्यू
अचानक येणारे पूर, दरडी कोसळणे आदी आपत्तीला तोंड देण्यासाठी स्थानिक ठिकाणची प्रशासकीय यंत्रणा गतीमान असली पाहिजे यासाठी जिल्ह्यांनी मागणी केलेल्या साहित्याची तसेच निधीची उपलब्धतता करून दिली असल्याचे ते म्हणाले.
आपत्कालीन परस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेली पूर्वतयारी, या कालावधीत प्रभावी संपर्कासाठी सॅटेलाईट फोन, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथक येथे तैनात करणे,आपत्ती कालावधीत तात्काळ संपर्कासाठी १०७७ हा संपर्क क्रमांकही नव्याने सुरू करण्यात आला आहे. अशी माहिती मंत्री वडेट्टीवार यांनी दिली.