JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल राजीनामा प्रकरणात मोठा ट्विस्ट, राजभवनातून आली महत्त्वाची माहिती

Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल राजीनामा प्रकरणात मोठा ट्विस्ट, राजभवनातून आली महत्त्वाची माहिती

‘छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहे’ असं म्हणून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी वादाला तोंड फोडले होते.

जाहिरात

(file photo)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 नोव्हेंबर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कोणत्या ना कोणत्या विधानामुळे कायम वादात सापडतात. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल नवं विधान केलं आहे. ‘आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’ असं विधान राज्यपालांनी केलं आहे. यानंतर राजकीय पक्षांसह काही संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. राज्यपालांना पदावरुन हटवण्याची मागणी केली जात आहे. सर्वच स्तरातून टीका होत असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या राज्यात परत जाण्याची व्यक्त केली इ्च्छा केल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. तसेच त्यांनी राज्यपाल पदावरुन पदमुक्त होण्याचे संकेत? दिले की काय, अशी चर्चा रंगली होती. अशी चर्चा रंगली असतानाच राजभवनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राजभवनातून काय माहिती आली -  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा देणार, याचं राजभवनातून खंडन केलं आहे. राज्यपालांविरोधात संभाजीराजे आक्रमक -  ‘छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहे’ असं म्हणून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी वादाला तोंड फोडले होते. पण, आठवडा उलटला तरीही राज्यपालांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांनी शिंदे सरकाराला कडक इशारा दिला आहे. हेही वाचा -  राज्यपाल कोश्यारी यांना हटवणे सोपं नाही! एका नियमावरुन येईल लक्षात भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? असा थेट सवाल संभाजीराजे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. राज्यपालांवर जर कोणतीही कारवाई होणार नसेल तर महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच, असा इशाराच संभाजीराजे यांनी दिला आहे. ’…हा राजद्रोहच म्हणायला हवा’, संजय राऊत राज्यपालांवर भडकले - ‘वीर सावरकरांच्या अपमान प्रकरणात भाजपने जो जोश व जोर दाखवला, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रकरणात दाखवला नाही. उलट छत्रपतींचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीचे समर्थन केले. शिवरायांचे चरित्र विसरले जात आहे. महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे कारस्थान यशस्वी होत आहे काय? असा सवाल करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. संजय राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून भाजपवर निशाणा साधला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या