मुंबई, 17 ऑक्टोबर : चोर कशाचीही चोरी करू शकतात. काहीवेळी विचित्र चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. आताही देशाची आर्थिक राजधानी मुंबईत अशीच घटना उघडकीस आली आहे. विहीर चोरीला गेली सिनेमानंतर अनेक जणांनी आपली विहिर चोरीला गेल्याच्या तक्रारी केल्या होत्या. पण आता पाण्याची चोरी झाल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली असून यामध्ये 73.18 कोटी रुपयांची चोरी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाण्याची चोरी तीसुद्धा थोडी थोडकी नाही तर तब्बल 73 कोटींची असल्याचं समजल्यानंतर आझाद मैदान पोलिसांनाही धक्का बसला. अधिक चौकशी केली असता समजलं की, पाण्याची चोरी 11 वर्षांपासून केली जात होती. या 11 वर्षांत आरोपींनी 73 कोटी रुपयांचं पाणी चोरल्याचं समोर आलं आहे. आता पोलिस आरोपींचा शोध घेत असून प्रकरणाची चौकशी करत आहेत.
महाराष्ट्र सध्या दुष्काळाचा सामना करत आहे. इथं पाण्याची बचत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जमिनीखाली पाण्याची पातळी कमी झाल्यानं भीषण पाणीटंचाई आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. VIDEO : ‘… म्हणून शरद पवारांना ईडीची नोटीस’, मुख्यमंत्री फडणवीस यांचा गौप्यस्फोट