लातूर, 09 ऑक्टोंबर : तुळजाभवानीचे दर्शन करून हैदराबादकडे निघालेल्या भाविकांची कार व लातूकरकडे जाणाऱ्या ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील वडील आणी मुलगी ही जागीच ठार झाले तर चार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लातूरला हलविण्यात आले आहे. ही घटना औसा तालुक्यातील वाघोली पाटीजवळ घडलीय.
हैदराबाद येथील एक कुटुंब ब्रिझा कारमधून शिर्डीचे दर्शन करून तुळजापूरात आले होते. पहाटे तुळजाभवानीचे दर्शन घेऊन हैदराबादकडे जात असताना वाघोलीपाटी जवळ लातूरकडे जाणाऱ्या ट्रक-कारचा भीषण अपघात झाला.
हे ही वाचा : Fire Prevention Day 2022 : आगीपासून बचावासाठी ठेवा लक्षात ‘या’ गोष्टी, टळू शकेल जीवितहानी
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच किल्लारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लागलीच 108 ची रूग्णवाहिका बोलावण्यात आली. त्यामुळे कारमधील इतरांचे प्राण वाचले आहेत.
नाशिकमध्येही भीषण अपघात, 10 जणांचा बळी
औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास भीषण अपघातात झाला. या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतला. या आगीत बसमधील जवळपास दहा प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना सदर अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
घटनास्थळी अग्निशमन दलाची तीन ते चार वाहनं तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आलं त्यांनी उड्या मारल्या तर आतमध्ये अडकलेले प्रवासी आगीमुळे जळून खाक झाले. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
हे ही वाचा : कुर्ल्यामध्ये इमारतीला भीषण आग; अनेकजण अडकल्याची भीती, काही लोक खिडकीतून बाहेर पडले, Video
सदर अपघातानंतर बस 50 ते 60 फूट पुढे घसरत गेली तर टँकर 70 ते 80 मीटर पुढे जाऊन थांबला. या अपघातात बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बसमधून हलविण्यात आले. या घटनेत 10 लोक जळून खाक झाले तर 34 जणांवर उपचार सुरू आहेत.