उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा असल्याबाबत 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपर प्रतिज्ञापत्र तसेच निष्ठापत्र प्रत्येक शिवसैनिकांकडून भरुन घेतलं जात आहे.
नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 17 जुलै : शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे मोठा वाताहात झाली आहे. अनेक खासदार, आमदार आणि पदाधिकारी हे शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण, दुसरीकडे, निष्ठावंत शिवसैनिक अजूनही सेनेतच आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जळगावात मोठ्या प्रमाणात 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र लिहून घेतले जात असल्याचे चित्र समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना दोन गटात विभागली असून एकनाथ शिंदेआणि उद्धव ठाकरे असे दोन गट पहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातही याचा परिणाम पहायला मिळत आहे. त्याच पाश्वभूमीवर उध्दव ठाकरे यांचे समर्थक शिवसैनिक हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होवू नये म्हणून जळगावात शिवसेनेकडून मोठी काळजी घेतली जात आहे. ( सहकुटुंब सह परिवार, घरात आढळले तब्बल 11 विषारी कोब्रा साप, VIDEO ) उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा असल्याबाबत 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपर प्रतिज्ञापत्र तसेच निष्ठापत्र प्रत्येक शिवसैनिकांकडून भरुन घेतलं जात आहे. आतापर्यंत महापालिकेचे नगरसेवक तसंच पदाधिकारी व शिवसैनिक अशा 300 पेक्षा जास्त जणांनी हे निष्ठापत्र भरुन दिलं आहे. नेमकी उद्धव ठाकरेंची शिवसेना वाचविण्यासाठी ही मोहीम राबविली जात आहे का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थितीत केला जात आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरूच दरम्यान, जळगावात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला जय श्रीराम करत शिंदे गटाला पाठींबा जाहीर केला आहे. ( अलिशान फ्लॅटपेक्षा कमी नाहीय शिल्पाची नवी Vanity Van; समोर आला Inside Video ) राजीनामा देणाऱ्यांमध्ये उपजिल्हाप्रमुख, शहर प्रमुख, तालुकाप्रमुख, विभागप्रमुख यांच्यासह काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत. धरणगाव तालुका हा विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात मोडतो, हा मतदारसंघ माजीमंत्री गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे ही राजकीय घडामोड महत्वाची मानली जात आहे.